शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'सगेसोयरे' टिकणार नव्हते तर न्यायाधीश घेऊन कशाला आले होते; मनोज जरांगे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:25 IST

लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : 'सगेसोयरे' अधिसूचना कोर्टात टिकली नाही तर दुसरा पर्याय राहत नाही, असे मंत्री शंभूराज देसाई माध्यमांसमोर बोलले होते. यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टिकणारच आहे ना, ते टिकणार नाही तर न्यायाधीश कशाला आणले होते? ते टिकणार नाही असं मी म्हणालो होतो, म्हणून तुम्ही न्यायाधीश आणले होते ना? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. तुम्ही म्हणत असाल टिकत नाही, तर आमची मूळ मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती पूर्ण करा असेही जरांगे म्हणाले.

२० तारखेला बेमुदत उपोषण करू नये, अशी समाजाची भावना आहे. समाजाची माया आहे, प्रेम आहे मी ते कधीच विसरणार नाही. मी त्यांचा शब्द डावलतोय अस नाही. शेवटी त्यांचा शब्द कशासाठी डावलतो यालाही महत्त्व आहे. बेमुदत उपोषण हीच माझी शक्ती आहे. लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.

मी काही कोणाची सुपारी घेतली नाहीते प्रत्येक सभेमध्ये माझ्यावर टीका करतात असे, गिरीश महाजन म्हणाले होते, यावर जरांगे म्हणाले, तुम्हाला बोललो होतो. तुमच्याशी आमची नाराजी असण्याचे काही कारण नाही. मी फक्त म्हणलो आरक्षण टिकणार द्यावं, म्हणून त्यांना माझा राग आलेला दिसतो. तुमच्यावर टीका करावी हा माझा धंदा नाही. मी काय कोणाच्या सुपाऱ्या घेत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी महाजन यांना दिले.

... तर सरकारसोबत चर्चा करूगिरीश भाऊ तुम्हीच ठरवायला होतात. सगेसोयऱ्यासाठी तुम्हीच न्यायाधीश आणले होते. तुम्ही म्हणालात सगेसोयरेची अंमलबजावणी केली तरी टिकणार नाही. म्हणून तुम्ही फक्त खरं बोला. आम्ही पुन्हा तुमच्याशी अंतरवाली सराटीत चर्चा करायला तयार आहोत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकार सोबत चर्चेचे दार खुले असल्याचे संकेत दिले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना