शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दरोडा, अपघाताच्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:02 IST

घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.

विजय मुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. माहिती मिळताच काही ठिकाणच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी, कर्मचा-यांची तत्परता तपासण्यासाठी दिल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.पोलीस ठाण्यांमधील कामकाजात सुसूत्रता यावी, सर्व कामे वेळेत व्हावीत, तक्रारदारांच्या तक्रारी घेण्यासह त्यांना चांगली वागणूक मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे वेळोवेळी अधिकारी, कर्मचा-यांना सूचना देत आहेत. शिवाय ठाणेस्तरावरील गुन्ह्यांचे प्रमाण, तपास यासह इतर बाबींवरही बैठकांमध्ये मार्गदर्शन केले जाते.ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी सतर्क राहतात का? ठाण्यात येणाºया तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते का ? तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचारी तातडीने हालचाली करतात का ? यासह इतर बाबींची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी सायंकाळी तक्रारी घेऊन काही नागरिकांना पाठविले होते. हे तक्रारदार पाठविताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. अचानक दरोडा, लूटमार, अपघातासह इतर तक्रारी दाखल झाल्याने कर्मचा-यांसह अधिका-यांची धांदल उडाली. तक्रारदाराकडून माहिती घेऊन घटनास्थळी जाणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, पथकांना पाचरण करणे इ. प्रक्रिया काही ठाणेस्तरावरून राबविण्यात आली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे समजताच अधिकारी, कर्मचा-यांना हायसे वाटले. या तक्रारीच्या परीक्षेत काही ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी पास झाले होते. तर इतर काही ठिकाणावरील अहवाल रात्री उशिरापर्यंत वरिष्ठांकडे आला नव्हता.तत्परता पाहण्यासाठी राबविला उपक्रमपोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी सतर्क राहावे, ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार नोंदवून घ्यावी, तक्रारीनुसार तातडीने कार्यवाही करावी, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणेस्तरावरील अधिकारी, कर्मचारी किती सतर्क आहेत? तक्रारदाराला वागणूक कशी मिळते? तक्रारीनुसार कार्यवाही होते का याची पाहणी करण्यासाठी शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व ठाणेस्तरावरील उपक्रमांचा अहवाल मागिवला असून, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºयांवर कारवाई होईल. -समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाDacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी