शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

माहेश्वरी वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:40 IST

माहेश्वरी विवाह समितीच्या वतीने जालन्यात रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील माहेश्वरी विवाह समितीच्या वतीने जालन्यात रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून, जवळपास ५३५ जणांनी येथे हजेरी लावून एकमेकांचा परिचय करून घेऊन विवाह संदर्भातील सर्व आवश्यक ती माहिती जाणून घेतली. या विवाह सोहळ्यासाठी एक लाख चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला होता.या मेळाव्यात सहभागी नोंदणी केलेल्यांनी आज येथे उपस्थिती होती. सकाळपासून या मंडपात वधू-वर तसेच त्यांच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. वधू-वरांसाठी वेगळे दालन करण्यात आले होते. त्यात वैद्यकीय, खाजगी तसेच व्यवसाय, उद्योग करणाऱ्यासाठीच्या दलनांचा समावेश होता. याचे परिचय संमेलनाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ पदाधिकारी विमला साबू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिजमोहन तोष्णीवाल, अ‍ॅड. चिरंजीव दागडिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेशकुमार जेथलिया आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी विवाह समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल राठी यांनी प्रास्ताविकातून या संमेलनाचे महत्व आणि गरज पटवून दिली. या परिचय संमेलनामुळेअनेकांचे संसार उभे राहिल्याचे मोठे समाधान आम्हा संयोजन समितीला असल्याचे राठी यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकारचे संमेलन ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष राजेश सोनी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.एक लाख चौरस फूट मंडपात प्रारंभी नोंदणी केंद्र तसेच वधू-वर आणि त्यांच्या पालकांना आपसात एकमेकांशी संवाद साधता यावा म्हणून मंडपात स्वतंत्र व्यवस्था केली होती. यावेळी भोजन व्यवस्थेसह स्मरणिकाही देण्यात येत होती. बाहेर गावाहून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तसेच वधू-वर आणि त्यांच्या पाल्यांचे स्वागत करताना येथील विवाह संयोजन समितीचे सदस्य कुठेच कमी पडले नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकcommunityसमाज