शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:55 IST

१२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्षिक नियोजन सामान्य फंडावर अवलंबून असते. कारण गावातून जमा होणाऱ्या विविध करामधून ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन, पथदिवे लावणे, गावातील नाल्यांची साफसफाई, याशिवाय वेळेवर येणारी कामे सुध्दा सामान्य फंडातून करावा लागतो. मात्र तालुक्यातील अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सामान्य फंड खाते निरंक आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाने कर वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्नच करण्यात येत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत विकासावर झाला आहे. गावागावा राजकीय हस्तक्षेपामुळे सुध्दा कर वसुलीस मर्यादा येत असल्याचे सागण्यात येत आहे.यामुळे अनेक गावात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. विशेष म्हणणे सामान्य फंडात पैशाअभावी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन सुध्दा वर्षानुवर्ष प्रलंबीत राहत आहे. यामुळे कर्मचा-यांना संसाराचा गाडा घाकणे दिवसेदिवस कठीण झाले आहे. अनेक वेळा गटविकास अधिका-याकडून गावस्तरावर कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र कर भरण्यास नागरिकांची सुध्दा उदासिनता असल्याने म्हणावी तशी वसुली होण्यास अडचणी येत असल्याने सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात पिण्याच्या पाणी, दिवाबत्ती, रस्ते दुरूस्ती आदी कामे करण्यात येतात. ग्रामपंचात कडून विविध सुविधा पुरविल्यानंतर सुध्दा नागरिकाकडून कर भरण्याबाबात दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी ग्रामसेवकांनी कर वसुलीबाबात केलेल्या प्रयत्नासुध्दा यश येत नाही. परिणामी वसुली रखडली जात असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधी