शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांत होणार फेरमूल्यांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:42 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे.समृद्धी महामार्गासाठी जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदुळवाडी, जामवाडी, पानशेंद्रा, अहंकार देऊळगाव, नंदापूर, थार, कडवंची या गावांमधील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी थेट वाघाटाघाटीने जमीन खरेदीसाठी सर्व गावांमधील जमिनीचे दर प्रशासनाने जाहीर केले आहे. दर जाहीर झाल्यानंतर अनेक शेतक-यांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण झाले असून, शेतक-यांना मोबदलाही देण्यात आला आहे.मात्र, आंबेडकरवाडी, निधोना, तांदूळवाडी, गुंडेवाडी व जामवाडी येथील शेतक-यांनी दर निश्चित समितीने जाहीर केलेला प्रतिहेक्टरी दराऐजवी प्रती चौरस मीटर दराने वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. या गावांमधील जमीन शहरालगत असून, अकृषक क्षेत्राला लागून आहे. त्यामुळे शहरी भागातल्या जमिनीप्रमाणे बाजार भावाच्या चार पट मोबदला मिळावा, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे आंबेकरवाडी, जामवाडी येथील एकाही शेतक-याने अद्याप समृद्धीसाठी जमीन दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी आंबेडकरवाडी येथे संयुक्त मोजणीसाठी गेलेल्या पथकाला शेतक-यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह रस्ते विकास महामंडळासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. जमिनीला प्रति चौरस मीटर दर देण्याची शेतकºयांची मागणी अव्यवहार्य असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, मार्चअखेर समृद्धी महामार्गासाठीच्या जमिनीचे संपादन करावयाचे असल्याने प्रशासनाने या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास या तिन्ही गावातील जमिनीचे नवे दर निश्चित करून त्याची माहिती गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावांमधील समृद्धीसाठी संपादित करावयाच्या जिरायती जमिनीसाठी एकरी १५ लाख, हंगामी बागायती जमिनीसाठी २० लाख व बागायती जमिनीसाठी ३० लाखांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, जालना बाजार समितीला लागून असलेल्या गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील जमिनीला प्रती चौरस मीटरचा दर द्यावा, अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे. शेतक-यांच्या याच मागणीसाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली. शेतक-यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या होत्या.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र