शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

विमा काढताय... सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:26 IST

जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.

ठळक मुद्देसायबर सेलने लक्ष द्यावे : उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे पत्राव्दारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.केंद्र सरकारने आता वाहनांचा विमा उतरवतांना पुढील पाच वर्षाची रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब किचकट वाटत आहे. त्यामुळे यातून काही चुकीच्या व्यक्तींकडून इंटरनेटवरून नामांकित विमा कंपन्याचे बनावट लोगो तयार करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार पुढे येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी संजय मेहेत्रेवार आणि काळे यांनी जालना येथील सायबर सेलला या संदर्भात लेखी पत्र दिले आहे. अशा काही बनावट कंपन्या जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत, काय हे त्यांनी तपासावे, अशी विनंती या पत्रात केली असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या पध्दतीने विमा काढण्यास कोणीच जबादार राहणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.जालना : दररोज हजारो वाहनांची होतेय नोंदणीजालना जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक अधिकाºयांच्या कार्यालयात होत असते. हे करत असताना आता पुढील पाचवर्ष कालावधीचा विमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आॅनलाईन विमा भरताना त्यात काहीजण चुकीचे निकष लावून ग्राहकांची फसणूक करत आहेत. त्यामुळे विमा भरूनही जर एखादी दुर्घटना झाल्यास विमा कंपनीकडून मिळणारी आर्थिक नुकसान भरपााई मिळण्यास अडचणी येत येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहूनच विमा काढावा असे आवाहन केले आहे.नागरिकांनी सतर्क राहहावेही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहनधारकांनी त्यांच्या चारचाकी वाहन असो अथवा दुचाकी आॅनलाईन तसेच सायबर कॅफेमधून विमा काढण्याचे प्रयत्न न करता संबंधित विमा कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील अधिकृत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांशी संपर्क करूनच विमा काढावा असे आवाहनही उपप्रादेशिक अधिकारी महेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाSocialसामाजिक