शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

विमा काढताय... सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:26 IST

जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.

ठळक मुद्देसायबर सेलने लक्ष द्यावे : उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे पत्राव्दारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.केंद्र सरकारने आता वाहनांचा विमा उतरवतांना पुढील पाच वर्षाची रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब किचकट वाटत आहे. त्यामुळे यातून काही चुकीच्या व्यक्तींकडून इंटरनेटवरून नामांकित विमा कंपन्याचे बनावट लोगो तयार करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार पुढे येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी संजय मेहेत्रेवार आणि काळे यांनी जालना येथील सायबर सेलला या संदर्भात लेखी पत्र दिले आहे. अशा काही बनावट कंपन्या जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत, काय हे त्यांनी तपासावे, अशी विनंती या पत्रात केली असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या पध्दतीने विमा काढण्यास कोणीच जबादार राहणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.जालना : दररोज हजारो वाहनांची होतेय नोंदणीजालना जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक अधिकाºयांच्या कार्यालयात होत असते. हे करत असताना आता पुढील पाचवर्ष कालावधीचा विमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आॅनलाईन विमा भरताना त्यात काहीजण चुकीचे निकष लावून ग्राहकांची फसणूक करत आहेत. त्यामुळे विमा भरूनही जर एखादी दुर्घटना झाल्यास विमा कंपनीकडून मिळणारी आर्थिक नुकसान भरपााई मिळण्यास अडचणी येत येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहूनच विमा काढावा असे आवाहन केले आहे.नागरिकांनी सतर्क राहहावेही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहनधारकांनी त्यांच्या चारचाकी वाहन असो अथवा दुचाकी आॅनलाईन तसेच सायबर कॅफेमधून विमा काढण्याचे प्रयत्न न करता संबंधित विमा कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील अधिकृत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांशी संपर्क करूनच विमा काढावा असे आवाहनही उपप्रादेशिक अधिकारी महेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाSocialसामाजिक