शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:04 AM

शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची चारा छावणीला भेट : शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.रविवारी ठाकरे येणार म्हणून साळेगाव परिसरात मोठे उत्साही वातावरण होते. ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा साळेगावच्या प्रवेशव्दारावर येताच त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम संपल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक सजवलेली बैलगाडी तयार ठेवली होती. परंतु ठाकरे यांनी त्यात बसणे टाळले. त्यांनी थेट चारा छावणीत जाऊन जनावरांना वैरण दिले. तसेच तेथील जनावरांच्या मालकांशी संवाद साधून मुबलक चारा, पाणी येथे मिळते काय, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या चेहºयावरही एक प्रकारची चिंता आणि शेतकºयांबद्दल असलेला जिव्हाळा दिसून आला.केवळ शेतक-यांसाठी ठाकरे हे विशेष विमानाने रविवारी सकाळी औरंगाबादला आले आणि नंतर हॅलिकॉप्टरने ते जालन्यात आले. शेतकºयांना मदत वाटपासाठी एखाद्या बड्या नेत्याने विमान आणि हॅलीकॉप्टरने येऊन जी मदत केली. त्याबद्दल उपस्थितांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ठाकरे यांनी जालन्यात आल्यावर प्रथम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली.पाणी वळवणे गरजेचे -जयदत्त क्षीरसागरसंपूर्ण मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचे पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात वळवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी मंत्री असताना त्याचा आराखडा तयार असून, त्याला जास्त निधीची गरज आहे.हा निधी मिळाल्यास हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकेल. तसेच झाल्यास मराठवाड्यातील पाणी प्रश्न संपूर्णपणे निकाली निघेल असे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शिवसेनेची मदतमराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून पुढाकार घेत आहोत. परंतु केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता, शेतकºयांना तातडीने मदत व्हावी या हेतूने आजचा हा कार्यक्रम खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात आणला आहे.सेना शेतकºयांसाठी नेहमी धावून येते. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी क्षीरसागर यांनी जो आराखडा सूचविला आहे, त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तो मुद्दा मांडू, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAgriculture Sectorशेती क्षेत्र