शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जालना जिल्ह्यातील शिक्षकांचे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:33 IST

राज्यातील विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाने पगारी सुरू कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविना अनुदानित शाळा : १८ वर्षापासून सेवा; शासनस्तरावरून वेतन सुरू करण्याची मागणी

जालना : राज्यातील विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाने पगारी सुरू कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शहरातील अंबड मार्गावरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आले.मुल्यांकन व निकषाची पूर्तता करुन अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या या शाळांना शिक्षणमंत्री अशिष शेलार यांनी शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्विकारताच तिसऱ्या दिवशी विनाअनुदानीत शाळेच्या संदर्भात अधिवेशन संपताच १५ दिवसाच्या आत निर्णय घेवून शिक्षकांना पगार सुरु केला जाईल. यासाठी लागणारी आर्थिक तरतुद झाल्याचे सभागृहात सांगितले. त्यानंतर उपसमितीची बैठकही झाली. परंतु या नंतरची प्रक्रिया तीन कॅबिनेट बैठका होवून गेल्या तरी निर्णय झालेला नाही. क्रांतीदिनापासून महाराष्ट्रात उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, यावर कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने शुक्रवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.यावेळी समितीचे विभागीय अध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, सचिव प्रा.गणेश आघाव, सहसचिव प्रा. प्रविण भुतेकर, कोषाध्यक्ष विलास नवले, प्रसिध्दी प्रमुख प्रा. सुभाष जिगे, जालना जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश शेळके, कार्याध्यक्ष प्रा. भगवान काळे, उपाध्यक्ष प्रा. किशोर चव्हाण, सचिव ज्ञानेश्वर वायाळ, सहसचिव मकरंद वैद्य, तालुकाध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रा. संतोष पठाडे, प्रा. प्रविण लहाने, प्रा. अनिल पंडित, प्रा. संतोष हरणे यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. मंडळ अधिकारी एच. एस.गिरी, तलाठी आय.बी.सरोदे यांनी निवेदन स्वीकारले.

टॅग्स :JalanaजालनाTeacherशिक्षकagitationआंदोलन