शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:35 AM

: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात मंथन करण्यासह प्राथमिक व्यूहरचना निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.राजूर येथे रविवारी एका मंगलकार्यालयाच्या लॉन्सवर ही बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन ते सोडेतीन तास चालली. यावेळी भविष्यात शिवसेने सोबत युती झाली तरी ठीक नसता, स्वबळावर लढल्यानंतर विरोधकास नामोहरम करण्यासाठी कोणकोणत्या मुद्यांचा आधार घ्यायाचा याचा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिला. एकूणच या बैठकीत निवडक आणि विश्वासू पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीदरम्यान सर्वांचे मोबाईल स्विचआॅफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने एक, एक विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदार संघात खा.दानवे हे १९९९ पासून लोकसभेवर निवडून जात आहेत. १९९९ मध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तर काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर हे होते. त्यावेळी दानवे यांनी विजय मिळवला.२००४ साली भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तमसिंग पवार यांच्यात थेट लढत झाली. दानवेंनी त्यांचाही पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात आ. कल्याण काळे हे होते. त्यांनी दानवे यांना चांगलाच घाम फोडला होता. त्यावेळी दानवे हे केवळ साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्ये दानवेंच्या विरोधात औरंगाबाद येथील काँग्रेसचे नेते कल्याणराव औताडे यांनी लढत दिली. मात्र, मोदी लाटेत दानवे हे तब्बल अडीच लाख मतांनी विजयी झाले.या चारही निवडणुकीत शिवसेने सोबत भाजपची युती होती, हे विसरून चालणार नाही. त्यावेळी कोणी काम केले आणि कोणी केले नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आता मात्र, राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याची डरकाळी फोडली आहे. त्यामुळे भाजप सतर्क न झाल्यास नवल. त्या दृष्टीने रविवारच्या बैठकीला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाहीयुती होवो अथवा न होवोआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेने सोबत युती झाली तरी ठिक आणि न झाली तरी आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. आपल्या समोर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हींचे आव्हान लक्षात घेवून राजकीयपक्ष म्हणून आम्ही तयारीला लागलो आहोत. निवडणुका या नियोजन करूनच लढवाव्या लागातत, त्यामुळे आजची बैठक बोलावली होती. त्यात आम्ही काय करणार याची प्राथमिक चाचपणी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला आहे.- रावसाहेब दानवे, खा. तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारण