शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, सजवलेल्या बैलगाडीतून पाहणीवर राजू शेट्टी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 18:30 IST

पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले.

- राजू छल्लारेवडीगोद्री (ता.अंबड) : नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली, हे काय विमा कंपनीला समजत नाही का? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सजवलेल्या बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाची पाहणी केल्यामुळे त्यांच्यावर त्यांनी यावेळी  टीका केली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले. त्यामुळे  राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मदत देता येत नाही तर किमान त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अशा शब्दात टीका केली. जालना जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्या नुकसानीचे ना पंचनामे ना मदत मिळाली. आता परत परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी, मक्का, मोसंबी, द्राक्ष व डाळिंब आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेतकऱ्यांना शासनाने आधार देणे गरजेचे असताना पालकमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्यासाठी फिरत आहेत काय?, असा सवाल राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांना केला आहे.

नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली. हे विमा कंपनीला समजत नाही का? तक्रार करून देखील विमा कंपन्या लक्ष देत नसतील तर सरकार करतं तरी काय? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, राजेंद्र खटके, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गणेश गावडे, शिवाजी लहाने, बाबासाहेब दखणे, बप्पासाहेब काळे, अंकुश तारख, रामेश्वर लहाने, विष्णू नाझरकर, गणेश कव्हळे, अजय काळे, लक्ष्मण उघडे, धनराज चिमणे, शुभम सोळंके, मंगेश लहाने, प्रवीण लहाने, योगेश नाझरकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी