शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:00 IST

मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.समस्त ओबीसी समाजाच्यावतीने रविवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती सिंदखेडराजा मार्गावरील राजमाता जिजाऊ मॉ साहेब प्रवेशद्वार येथे उत्साहात साजरी कण्यात आली. यावेळी आ. कैलास गोरंट्याल बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आ. गोरंट्याल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरू शकणार नाही. त्यांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून सर्व समाज घटकांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन गौरवशाली विचार घडविला आहे.गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा शूरवीर व रयतेचा राजा घडविल्यामुळे जगाच्या पाठीवर आज त्यांचे नाव कोरले गेले आहे. हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला असून, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक समस्त ओबीसी समाजाचे निमंत्रक राजेंद्र राख यांनी केले. राख म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेची मूळ कल्पना राजमाता जिजाऊ यांचीच होती. म्हणून शिवरायांच्या सैन्यदलामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना मानाचे स्थान मिळाले होते. जिजाऊ यांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असेही राख म्हणाले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदारSocialसामाजिक