शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:00 IST

मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.समस्त ओबीसी समाजाच्यावतीने रविवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती सिंदखेडराजा मार्गावरील राजमाता जिजाऊ मॉ साहेब प्रवेशद्वार येथे उत्साहात साजरी कण्यात आली. यावेळी आ. कैलास गोरंट्याल बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आ. गोरंट्याल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरू शकणार नाही. त्यांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून सर्व समाज घटकांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन गौरवशाली विचार घडविला आहे.गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा शूरवीर व रयतेचा राजा घडविल्यामुळे जगाच्या पाठीवर आज त्यांचे नाव कोरले गेले आहे. हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला असून, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक समस्त ओबीसी समाजाचे निमंत्रक राजेंद्र राख यांनी केले. राख म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेची मूळ कल्पना राजमाता जिजाऊ यांचीच होती. म्हणून शिवरायांच्या सैन्यदलामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना मानाचे स्थान मिळाले होते. जिजाऊ यांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असेही राख म्हणाले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदारSocialसामाजिक