शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:00 IST

मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.समस्त ओबीसी समाजाच्यावतीने रविवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती सिंदखेडराजा मार्गावरील राजमाता जिजाऊ मॉ साहेब प्रवेशद्वार येथे उत्साहात साजरी कण्यात आली. यावेळी आ. कैलास गोरंट्याल बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आ. गोरंट्याल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरू शकणार नाही. त्यांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून सर्व समाज घटकांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन गौरवशाली विचार घडविला आहे.गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा शूरवीर व रयतेचा राजा घडविल्यामुळे जगाच्या पाठीवर आज त्यांचे नाव कोरले गेले आहे. हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला असून, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक समस्त ओबीसी समाजाचे निमंत्रक राजेंद्र राख यांनी केले. राख म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेची मूळ कल्पना राजमाता जिजाऊ यांचीच होती. म्हणून शिवरायांच्या सैन्यदलामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना मानाचे स्थान मिळाले होते. जिजाऊ यांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असेही राख म्हणाले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदारSocialसामाजिक