शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राजीव गांधी यांच्या विचारामुळेच देशाची चौफेर प्रगती होईल - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : देशाला तंत्र विज्ञानात स्व. राजीव गांधी यांनी परिपूर्ण केल्यामुळे देशाची प्रत्येक क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : देशाला तंत्र विज्ञानात स्व. राजीव गांधी यांनी परिपूर्ण केल्यामुळे देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे. संगणक क्षेत्रात देश पुढे गेल्यामुळे युवकांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.

जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी येथील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख बोलत होते. कार्यक्रमात प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार देशाला प्रगतीपथावर नेण्याचा असून, जनसामान्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी तंत्र विज्ञानात देशाला पुढे नेऊन आधुनिक भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले. यावेळी अ. भा. का. सदस्य भीमराव डोंगरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश काँग्रेसचे सचिव सत्सग मुंढे, विजय कामड, डॉ. राधेशाम जैस्वाल, डॉ. विशाल धानुरे, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, फकिरा वाघ, सोपान सपकाळ, अजीम बागवान, शेख शफीक, शाम घोरपडे, आदी उपस्थित होते.