शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या उमेदवारीला राजेश टोपेंची ‘ना-ना’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:27 IST

काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असे झाल्यास जो मतदारसंघ काँग्रेसासाठी सुटला असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी आणि जो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला असेल तेथे काँग्रेसने आघाडीधर्म पाळावा असे सांगतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश टोपे यांनाच आपण लोकसभेच्या मैदानात उतवल्यास कसे राहील असा सवाल केला.

ठळक मुद्देसमर्थ कारखान्याचा गळीत हंगाम : अजित पवारांकडून आधी घोषणा, नंतर सारवासारव

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असे झाल्यास जो मतदारसंघ काँग्रेसासाठी सुटला असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी आणि जो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला असेल तेथे काँग्रेसने आघाडीधर्म पाळावा असे सांगतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश टोपे यांनाच आपण लोकसभेच्या मैदानात उतवल्यास कसे राहील असा सवाल केला. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. मात्र, नंतर लगेचच टोपेंकडून ‘उमेदवारी नको’ अशी खुणवाखुणवी झाल्याने मोठा राजकीय गोंधळ उडाला.मंगळवारी अजित पवार यांच्या हस्ते कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर रोखठोक मत व्यक्त केले. आगामी काळ हा निवडणुकीचा असल्याने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप-सेनेला दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही आमची इच्छा आहे. हा मतदारसंघ राष्टÑवादीला सुटल्यास राजेश टोपेंना उमेदवारी दिल्यास कसे राहिल, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. टोपे यांची उमेदवारी जाहीर करण्याचे हे व्यासपीठ नाही असे सांगून नंतर त्यांनी सारवासारवही केली. उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय हे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार घेतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान राजेश टोपे यांनी १९९६ ला जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यात ते पराभूत झाले होते. व्यासपीठावर माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ.चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सतिश टोपे, युवकचे अध्यक्ष कपील आकात, रवींद्र तौर, बाळासाहेब वाकुळणीकर, संजय हर्षे, शिक्षण सभापती रघुनाथ तौर, प.स.सभापती लहाने, उपसभापती बाळासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती सतीश होंडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब कनके, समर्थ बँकेचे उपाध्यक्ष संजय कनके उपस्थित होते.मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील खरीपाचे पीक गेले. अनेक ठिकाणी रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. परंतु, सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी चालढकलपणा करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.कारखान्यांमुळे परिसरातील अर्थकारणावर मोठा प्रभाव पडतो. परिसराचा विकास होऊन आर्थिक उन्नती होते. कारखाने चांगले चालले तर शेतक-यांचे भविष्य उज्वल होऊन शेतकरी टिकेल आणि शेतकरी सुधारला तर राज्य सुधारेल यासाठी शेतकरी हा केंदबिंदू मानून काम करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी साखर उत्पादनाबरोबर, वीज निर्मिती, डिस्टीलरी, इथेनॉल यासारख्या उपपदार्थांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.केंद्र सरकारसह शिवसेनेवर टीकाअजित पवार यांनी केंद्र सरकारच्या एकूणच धोरणावर टीकेची झोड उठविली. निरव मोदी, मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांना हे केंद्र सरकार मदत करत आहे. मेहूल चोक्सीला तर एका केंद्रीय मंत्र्यांच्या जावयाने परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचे पुढे आले आहे. संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तर कर्जमाफी हा घोटाळा असल्याची उपरती शिवसेनेला आता झाली आहे. एकूणच यात घोटाळा झाला असेल तर, तुम्ही देखील या सरकारचाच एक भाग आहात.हे विसरून कसे चालेल असे सांगून, शिवसेनेचे नेते म्हणे आता २५ तारखेला अयोध्येला जाणार आहेत. त्यांनी अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले की, ज्यांना आपल्या वडिलाचे स्मारक अद्याप बांधता आले नाही. हे अयोध्येत जाऊन काय दिवे लावणार, असा थेट आरोप केल्याने खळबळ उडाली. औरंगाबाद येथील महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.शिवसेनेचे आंदोलनशिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले आणि डॉ. हिकमत उढाण यांनी मंगळवारी गळीत हंगमाच्यावेळी कारखाना परिसरात अचानक उपोषण केले. शेतकºयांचे ३५ कोटी रूपये हे कारखान्याने थकविल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना वडले व उढाण यांनी समर्थ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर टीका केली.

टॅग्स :JalanaजालनाAjit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपे