शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जालन्यात पावसाचा कहर; पिकांमध्ये पाणी, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 15:43 IST

rain in jalana : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळाला अतिवृष्टीचा फटका

ठळक मुद्देअनेक गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १७६.४४ टक्के पाऊस

जालना : ज्या पावसाची प्रतीक्षा अतुरतेने पाहिली जात होती त्यांचा अतिवृष्टी रूपी कहर पाहता अनेकांना पाऊस कधी थांबेल अशीच चिंता लागली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ४७.९० मिमी पाऊस झाला असून, ४९ पैकी १३ महसूल मंडळाला अतिवृष्टीने झोडपले आहे.

चालू महिन्यात जिल्ह्यात जणू पावसाचा कहर झाला आहे. जिल्ह्याची आजवर अपेक्षित वार्षिक सरासरी ५९३.६५ मिमी आहे. परंतु, या सरासरीपेक्षा अधिक एक हजार मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे दहा दरवाजे मंगळवारी सकाळी पुन्हा उघडण्यात आले आहेत. मंठा, घनसावंगी, अंबड तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यातील दानापूर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जुई नदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पारध येथून वाहणाऱ्या रायघोळ नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. भोकरदन तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा मध्यम प्रकल्पही मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाला असून,केदारखेडा भागातून वाहणारी गिरजा- पूर्णा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. शिवाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी रात्री, मंगळवारी दिवसभरात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या- सुरल्या आशाही आता पाण्यात गेल्या असून, खरिपातील उत्पन्नाची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

या मंडळांना अतिवृष्टीचा तडाखाभोकरदन तालुक्यातील धावडा (१०५.३ मिमी), आन्वा (१२० मिमी), पिंपळगाव (६६.३ मिमी), जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी (९५.३ मिमी), वरूड (१३१.५ मिमी), जालना तालुक्यातील पाचन वडगाव मंडळात ६५ मिमी पाऊस झाला आहे. अंबड (६७. मिमी), धनगरपिंपरी (६६.३ मिमी), गोंदी (१०१ मिमी), वडीगोद्री (११६ मिमी), सुखापुरी (८८.३ मिमी), बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात ६६. ५ मिमी पाऊस झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी मंडळात ६६.५ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १७६.४४ टक्के पाऊसजिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी आहे. या सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १७६.४४ टक्के (१०७६ मिमी) पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता जालना तालुक्यात १७४.२० टक्के, बदनापूर तालुक्यात १६६.५७ टक्के, भोकरदन तालुक्यात १६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यात १५४.८७ टक्के, परतूर तालुक्यात १६४.११ टक्के, मंठा तालुक्यात १५९.५९ टक्के, अंबड तालुक्यात २१४.४९ टक्के तर घनसावंगी तालुक्यात १८५.९५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाagricultureशेती