शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जालना जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:04 IST

जालना जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील विरेगाव शिवाराला वादळी वा-याचा जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत पोल वाकल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला.जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही वेळ ऊन पडल्यानंतर सायंकाळी पुन्हा ढग दाटून आले. जालना शहर व परिसरात काही वेळ वादळी वारे सुटले. तालुक्यातील विरेगाव, हस्तेपिंपळगाव, धानोरा, कवणातांडा, विरेगावतांडा भागात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. विरेगाव परिसरात मंठा रस्त्यालगतच्या हॉटेल्स, रसवंतीगृहांवरील पत्रे हवेमुळे उडाले. वादळी वा-यासह तासभर जोरदार पाऊस झाला. २० मिनिटे सुपारीच्या आकाराच्या गाराही पडल्या. गारपिटीमुळे अांबा, मोसंबीसह भाजीपाला, फळबागा व शेडनेटचे नुकसान झाले.धानोरा शिवारातील वीट भट्ट्यांचे पावसामुळे नुकसान झाले. घनसावंगी तालुक्यातील राजेगाव, गुरुपिंप्री, मोहपुरी, पनवाडी, हिवरा, बहीरगड, बोलेगाव, रांजणी भागात तासभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परतूर शहर व परिसरात सायंकाळी हलका पाऊस झाला.टेंभूर्णीसह परिसरात सोमवारी वादळी वा-यामुळे केशर आंब्याचे नुकसान झाले. यावर्षी केशर आंब्याला चांगला बहर आला होता. मात्र, नैसर्गिक संकटाने केशर आंब्याचे नुकसान झाल्याचे आंबा उत्पादक संजय मोरे, माधवराव अंधारे, गजेंद्र खोत, शंकर खोत यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfruitsफळे