शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

दिवाळीत पावसाची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:15 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोयाबीन आणि कपाशीला याचा मोठा फटका बसला आहे. या परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नव्यानेच निवडून आलेले आ. कैलास गोरंट्याल तसेच आ. राजेश टोपे आणि माजी आ. अर्जुन खोतकरांनी केली आहे.जालना जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडतो की, नाही अशी चिंता होती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मोठी मुसंडी मारून जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, यापूर्वीच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे या भागात दुष्काजन्य स्थिती होती. ती आता दूर झाली असून, आता सोयाबीनची सोंगणी आणि कपाशी काढणीला या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त फटका सोयाबीनला बसला असून, कपाशीच्या कैºयातून पुन्हा कोंब निघाल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडले आहे. जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पीरकल्याणसह रामनगर परिसरातील द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे दिवाळी सणाचे कारण न देता तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांशी चर्चा करताना केली. तसेच आमदार राजेश टोपे यांनी देखील या संदर्भात एक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी जिल्हाधिका-यांनी पथक नेमून पंचनामे करावे अशी मागणी केली आहे.परतीच्या पावसाने ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची माहिती एकत्रित करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाने त्यांच्या तालुका पातळीवरील अधिकाºयांना या पूर्वीच दिले आहेत.तसेच पीकविमा कंपनीच्या अधिका-यांनी देखील तातडीने ज्या गावातून पीकविमा काढलेला आहे, अशा गावात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, असेही कृषी विभागाने विमा कंपन्यांना सांगितले आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग