शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दिवाळीत पावसाची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:15 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोयाबीन आणि कपाशीला याचा मोठा फटका बसला आहे. या परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नव्यानेच निवडून आलेले आ. कैलास गोरंट्याल तसेच आ. राजेश टोपे आणि माजी आ. अर्जुन खोतकरांनी केली आहे.जालना जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडतो की, नाही अशी चिंता होती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मोठी मुसंडी मारून जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, यापूर्वीच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे या भागात दुष्काजन्य स्थिती होती. ती आता दूर झाली असून, आता सोयाबीनची सोंगणी आणि कपाशी काढणीला या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त फटका सोयाबीनला बसला असून, कपाशीच्या कैºयातून पुन्हा कोंब निघाल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडले आहे. जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पीरकल्याणसह रामनगर परिसरातील द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे दिवाळी सणाचे कारण न देता तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांशी चर्चा करताना केली. तसेच आमदार राजेश टोपे यांनी देखील या संदर्भात एक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी जिल्हाधिका-यांनी पथक नेमून पंचनामे करावे अशी मागणी केली आहे.परतीच्या पावसाने ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची माहिती एकत्रित करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाने त्यांच्या तालुका पातळीवरील अधिकाºयांना या पूर्वीच दिले आहेत.तसेच पीकविमा कंपनीच्या अधिका-यांनी देखील तातडीने ज्या गावातून पीकविमा काढलेला आहे, अशा गावात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, असेही कृषी विभागाने विमा कंपन्यांना सांगितले आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग