शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

भोकरदन परिसरात पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:39 IST

तालुक्यात रविवारी सायंकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने परिसरात वातावरणात गारवा पसरला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरासह तालुक्यात रविवारी सायंकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने परिसरात वातावरणात गारवा पसरला होता.पावसाअभावी तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पावसाअभावी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच रबीच्या हंगामावरही परिणाम झाला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असताना परिसरात भायडी, दानापूर, विरेगाव परिसरात सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील वातावरण ढगाळमय झाले होते. तसेच परिसरात सध्या गरमीमुळे नागरिक हैराण आहेत. पीक वाया गेल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे या पावसाचा पिकांना फायदा होण्याची शक्यता कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक असल्याने यामुळे जोरदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.पावसामुळे वेचणीस आलेला कापूस धोक्यातलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरात रविवारी झालेल्या रिमझिम पावसाने वेचणीस आलेल्या कपाशी भिजल्याने कपाशीचे नुकसान झाले. परिसरात आधीच अल्पशा पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी विहिरीच्या पाण्यावर कपाशीचे पीक जोपासले आहे. सध्या कपाशी वेचणीस आली आहे. मात्र परिसरात अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला आहे.पाऊस अजून जर असाच सुरु राहिल्यास शेतकºयांचे पांढरे सोने धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणयाची चिंता शेतक-यांना सतावत आहे. खरीप हंगामात डोळ्यात प्राण आणून पावसाची प्रतीक्षा केली; मात्र पावसाने दगा दिला. ऐन कापूस वेचणीच्या वेळेत पावसाने सुरुवात केल्याने शेतात फुटलेला कापुस ओलाचिंब झाला. दोन दिवसापासून ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पहायला मिळत होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेल्या पिकांची नासाडी होत आहे.तसेच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांना लागली आहे.

टॅग्स :Rainपाऊसcottonकापूस