शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वरुणराज अखेर प्रसन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:59 IST

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल एका महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतक-यांनी पेरण्या व लागवड केली होती. तर काही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता. परंतु जोरदार पाऊस झाला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील जालना, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अबंड या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. तब्बल एक ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जालना शहरातील नाल्या भरुन वाहिल्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच ताराबंळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस बरसल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.खरिपाच्या पिकांना तारलेजिल्ह्यात महिन्याभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतक-यांची पिके करपून गेली होती. परंतु , गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.शेतकरी सुखावलापावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलडला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेंक शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परिणामी, शेतकरी चिंतेत सापडला होता.पाऊस : परतूर, भोकरदन जोरदार बरसलापरतूर : शहरात दोन ते तीन तास जोरदार पाऊस बरसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने मोटार सायकल, स्कूटी सारखी वाहने बंद पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती.भोकरदन तालुक्यात शनिवारी चार वाजेच्या सुमारास सर्वदुर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे खरिपाच्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांनी शेतीवर करण्यात येणा-या खर्चाला सुध्दा आखडता हात घेतला होता. मात्र या पावसाने भोकरदनसह तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, आव्हाना, केदारखेडा, राजुर, पिंपळगाव कोलते, तळेगाव, नळणी, सिपोरा बजार यासह तालुक्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी