शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वरुणराज अखेर प्रसन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:59 IST

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल एका महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतक-यांनी पेरण्या व लागवड केली होती. तर काही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता. परंतु जोरदार पाऊस झाला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील जालना, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अबंड या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. तब्बल एक ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जालना शहरातील नाल्या भरुन वाहिल्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच ताराबंळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस बरसल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.खरिपाच्या पिकांना तारलेजिल्ह्यात महिन्याभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतक-यांची पिके करपून गेली होती. परंतु , गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.शेतकरी सुखावलापावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलडला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेंक शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परिणामी, शेतकरी चिंतेत सापडला होता.पाऊस : परतूर, भोकरदन जोरदार बरसलापरतूर : शहरात दोन ते तीन तास जोरदार पाऊस बरसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने मोटार सायकल, स्कूटी सारखी वाहने बंद पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती.भोकरदन तालुक्यात शनिवारी चार वाजेच्या सुमारास सर्वदुर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे खरिपाच्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांनी शेतीवर करण्यात येणा-या खर्चाला सुध्दा आखडता हात घेतला होता. मात्र या पावसाने भोकरदनसह तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, आव्हाना, केदारखेडा, राजुर, पिंपळगाव कोलते, तळेगाव, नळणी, सिपोरा बजार यासह तालुक्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी