शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वरुणराज अखेर प्रसन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:59 IST

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल एका महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतक-यांनी पेरण्या व लागवड केली होती. तर काही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता. परंतु जोरदार पाऊस झाला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील जालना, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अबंड या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. तब्बल एक ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जालना शहरातील नाल्या भरुन वाहिल्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच ताराबंळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस बरसल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.खरिपाच्या पिकांना तारलेजिल्ह्यात महिन्याभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतक-यांची पिके करपून गेली होती. परंतु , गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.शेतकरी सुखावलापावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलडला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेंक शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परिणामी, शेतकरी चिंतेत सापडला होता.पाऊस : परतूर, भोकरदन जोरदार बरसलापरतूर : शहरात दोन ते तीन तास जोरदार पाऊस बरसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने मोटार सायकल, स्कूटी सारखी वाहने बंद पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती.भोकरदन तालुक्यात शनिवारी चार वाजेच्या सुमारास सर्वदुर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे खरिपाच्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांनी शेतीवर करण्यात येणा-या खर्चाला सुध्दा आखडता हात घेतला होता. मात्र या पावसाने भोकरदनसह तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, आव्हाना, केदारखेडा, राजुर, पिंपळगाव कोलते, तळेगाव, नळणी, सिपोरा बजार यासह तालुक्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी