शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

जालन्यात पावसाचे थैमान सुरूच; २४ तासांत १७ मंडळांत अतिवृष्टी, नदी-नाले दुथडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:50 IST

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत.

जालना : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरू आहे. गत २४ तासांत जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी १७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. परतूर तालुक्यातील परतूर आणि श्रीष्टी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, या दोन्ही मंडळांत प्रत्येकी तब्बल १०२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत. सतत होणाऱ्या पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाहणी केली असून, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

गौतमी नदीवर पूल होईनापरतूर तालुक्यातील सावरगाव (बु.) शिवारातून वाहणाऱ्या गौतमी नदीलाही पूर आला होता. या नदीवरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून झालेले नाही. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंनी दोरी बांधून नागरिकांना धोकादायक स्थितीत पूल पार करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.

कोणत्या मंडळात अतिवृष्टीजालना तालुक्यातील जालना शहर ६६.३ मिमी, जालना ग्रामीण ६६.३ मिमी, परतूर तालुक्यातील परतूर १०२.३ मिमी, वाटूर ६५.५ मिमी, आष्टी ६६.५ मिमी, श्रीष्टी १०२.३ मिमी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात ६५.५ मिमी, शेलगाव ६९.५ मिमी, बावणे पांगरी ६८.८ मिमी, रोशनगाव ६५.५ मिमी पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव मंडळात ७७ मिमी, तीर्थपुरी ६९.८ मिमी, कुंभार पिंपळगाव ६९.८ मिमी, अंतरवाली ६९.८ मिमी, रांजणी ७९.५ मिमी, जांबसमर्थ ६६.५ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यातील मंठा मंडळात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी