शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST

फोटो जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी ...

फोटो

जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, ड्रायपोर्टसह परिसराला भेट देऊन माहिती संकलित केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जालना-खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक मंगळवारी जालना येथे दाखल झाले आहे. या मार्गावरील पाच तहसील परिसरातील व्यापार, उद्योग, शैक्षणिक संस्था, प्रवाशांची संख्या, कृषी मालाची आयात-निर्यात आदी विविध बाबींची पाहणी करून हे पथक रेल्वे विभागाला अहवाल देणार आहे. जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. सभापती अर्जुन खोतकर व संचालक मंडळाशी संवाद साधला.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ असून, या बाजारपेठेत मराठवाड्यासह विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातून शेतमाल विक्रीसाठी येतो. प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस, रेशीम, गूळ यासह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, फुले व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात स्टील, कापड, पत्रा उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे व्यापार व उद्योग वाढीसह रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गामुळे दळणवळण अधिक सोपे होऊन रेल्वे वाहतूक स्वस्त व सोयीस्कर होणार असल्याने ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल व अन्य वस्तू उपलब्ध होतील. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला विदर्भात पाठविण्यास सदर रेल्वेमार्ग उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली.

प्रस्तावित स्टेशन, तहसील परिसराची होणार पाहणी

हे पथक प्रस्तावित जालना-खामगाव मार्गावरील सहा तहसीलच्या ठिकाणांना भेटी देणार आहे, तसेच प्रस्तावित रेल्वे स्टेशनचीही पाहणी करणार आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करून अहवाल रेल्वे विभागाला दिला जाणार आहे. रेल्वे विभागाकडून तो अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे.

विकासाचा लोहमार्ग

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे काम साठ वर्षांनंतरही प्रलंबित आहे. व्यापार, उद्योग व दळण-वळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या लोहमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी रेल्वे सर्वेक्षण समिती पथकाकडे केली आहे.