शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST

फोटो जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी ...

फोटो

जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, ड्रायपोर्टसह परिसराला भेट देऊन माहिती संकलित केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जालना-खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक मंगळवारी जालना येथे दाखल झाले आहे. या मार्गावरील पाच तहसील परिसरातील व्यापार, उद्योग, शैक्षणिक संस्था, प्रवाशांची संख्या, कृषी मालाची आयात-निर्यात आदी विविध बाबींची पाहणी करून हे पथक रेल्वे विभागाला अहवाल देणार आहे. जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. सभापती अर्जुन खोतकर व संचालक मंडळाशी संवाद साधला.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ असून, या बाजारपेठेत मराठवाड्यासह विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातून शेतमाल विक्रीसाठी येतो. प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस, रेशीम, गूळ यासह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, फुले व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात स्टील, कापड, पत्रा उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे व्यापार व उद्योग वाढीसह रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गामुळे दळणवळण अधिक सोपे होऊन रेल्वे वाहतूक स्वस्त व सोयीस्कर होणार असल्याने ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल व अन्य वस्तू उपलब्ध होतील. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला विदर्भात पाठविण्यास सदर रेल्वेमार्ग उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली.

प्रस्तावित स्टेशन, तहसील परिसराची होणार पाहणी

हे पथक प्रस्तावित जालना-खामगाव मार्गावरील सहा तहसीलच्या ठिकाणांना भेटी देणार आहे, तसेच प्रस्तावित रेल्वे स्टेशनचीही पाहणी करणार आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करून अहवाल रेल्वे विभागाला दिला जाणार आहे. रेल्वे विभागाकडून तो अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे.

विकासाचा लोहमार्ग

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे काम साठ वर्षांनंतरही प्रलंबित आहे. व्यापार, उद्योग व दळण-वळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या लोहमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी रेल्वे सर्वेक्षण समिती पथकाकडे केली आहे.