शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST

फोटो जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी ...

फोटो

जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, ड्रायपोर्टसह परिसराला भेट देऊन माहिती संकलित केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जालना-खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक मंगळवारी जालना येथे दाखल झाले आहे. या मार्गावरील पाच तहसील परिसरातील व्यापार, उद्योग, शैक्षणिक संस्था, प्रवाशांची संख्या, कृषी मालाची आयात-निर्यात आदी विविध बाबींची पाहणी करून हे पथक रेल्वे विभागाला अहवाल देणार आहे. जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. सभापती अर्जुन खोतकर व संचालक मंडळाशी संवाद साधला.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ असून, या बाजारपेठेत मराठवाड्यासह विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातून शेतमाल विक्रीसाठी येतो. प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस, रेशीम, गूळ यासह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, फुले व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात स्टील, कापड, पत्रा उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे व्यापार व उद्योग वाढीसह रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गामुळे दळणवळण अधिक सोपे होऊन रेल्वे वाहतूक स्वस्त व सोयीस्कर होणार असल्याने ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल व अन्य वस्तू उपलब्ध होतील. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला विदर्भात पाठविण्यास सदर रेल्वेमार्ग उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली.

प्रस्तावित स्टेशन, तहसील परिसराची होणार पाहणी

हे पथक प्रस्तावित जालना-खामगाव मार्गावरील सहा तहसीलच्या ठिकाणांना भेटी देणार आहे, तसेच प्रस्तावित रेल्वे स्टेशनचीही पाहणी करणार आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करून अहवाल रेल्वे विभागाला दिला जाणार आहे. रेल्वे विभागाकडून तो अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे.

विकासाचा लोहमार्ग

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे काम साठ वर्षांनंतरही प्रलंबित आहे. व्यापार, उद्योग व दळण-वळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या लोहमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी रेल्वे सर्वेक्षण समिती पथकाकडे केली आहे.