शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मृतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला ...

जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातासह रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करणाऱ्यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. विशेषत: बेवारस मयतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक होत असून, इतर ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची या कामी मदत घेतली जात आहे.

रेल्वेस्थानकावर कायदा- सुव्यवस्था राहावी, रेल्वे अपघातानंतर जखमींना मदत मिळावी, यासाठी रेल्वे पोलिसांची टीम काम करते. जालना येथील रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवासी, एक्स्प्रेस रेल्वेंची संख्या मोठी आहे. रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. जिल्हा हद्दीतील ग्रामीण मार्गावर गरजेनुसार फाटक तयार करण्यात आले असून, याठिकाणीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत; परंतु अनेक जण रेल्वे येत असतानाही अचानक रेल्वेसमोर येत असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू होतो, तर अनेक जण रेल्वेखाली येऊन आत्महत्या करत आहेत. विशेषत: अनेकांचे मृतदेह रेल्वेपटरीच्या बाजूला बेवारस पडल्याचेही दिसून येते. गत दोन वर्षांतील रेल्वे पोलिसांकडे नोंद असलेल्या जवळपास २६ प्रकरणांमध्ये १६ मयतांची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

रेल्वे अपघात झाल्यानंतर संबंधित जखमींना शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. शिवाय रेल्वे अपघात होऊ नयेत, यासाठीही रेल्वे पोलीस दलाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते; परंतु मानसिक आजाराला बळी पडलेले बहुतांश नागरिक रेल्वेखाली येऊन आत्महत्या करीत असल्याचेही दिसून येते.

१० मृतदेहांची ओळख पटली नाही

गत दोन वर्षांत अपघातातील मयतांपैकी १६ जणांची ओळख रेल्वे पोलिसांना पटली आहे, तर जवळपास १० जणांची ओळख पटलेली नाही.

बेवारस मयतांची ओळख पटली नाही, तर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला पत्र दिले जाते. नगरपालिका प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जातात.

रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. एखाद्याची ओळख पटत नसेल, तर इतर पोलीस ठाण्यांना माहिती देऊन मयताची ओळख पटविण्यासाठीही आम्ही सतत प्रयत्न करीत असतो.

-रवी देशमुख, पाेउपनि. रेल्वे पोलीस

२०१९

रेल्वे अपघात ७

मृत्यू ७

२०२०

रेल्वे अपघात १९

मृत्यू १९