शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कुशल कामगारांमुळेच दर्जेदार ‘पोलाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

संकटमोचक म्हणून ओळख असलेले घनश्याम गोयल, महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले योगेश मानधनी यांनीदेखील वेळोवेळी स्टील उद्योगावर आलेल्या संकटांशी अत्यंत ...

संकटमोचक म्हणून ओळख असलेले घनश्याम गोयल, महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले योगेश मानधनी यांनीदेखील वेळोवेळी स्टील उद्योगावर आलेल्या संकटांशी अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे जाऊन ते सोडविले आहे. पोलाद आणि भाग्यलक्ष्मी या दोन स्टील कंपन्यांची निर्मिती ही दोन दशकांपूर्वीची आहे. आपण स्वत: वडिलांनी घालून दिलेल्या उद्योगाच्या वाटेवर चालत आहोत. यामध्ये परिवारातील सदस्य आणि लहान बंधू विशाल अग्रवाल, काळानुरूप तंत्रज्ञानाची नाडी ओळखणारे संचालक नितीन काबरा, अनिल गोयल तसेच भारतीय परंपरा जपून काळानुरूप बदललेल्या उद्योगातही आपला आदर्श कायम ठेवणारे सुनील गोयल या सर्वांच्या मदतीने उद्योगाचा डोलारा उभारला आहे. त्यात जीवाला जीव देणारे कामगार आमच्याकडे असल्याने आजची आमची ही झेप यशस्वी होत आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची आम्ही परिवारातील सदस्यांप्रमाणेच काळजी घेताे.

एकूणच स्टील उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. हे तंत्रज्ञान आत्मसात करताना त्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असते. ट्रेनी इंजिनिअर्स आणि आयटीआय झालेल्यांना आज वेगवेगळ्या उद्योगांप्रमाणेच स्टील उद्योगातही मोठी मागणी आणि संधी आहे.

पोलाद आणि भाग्यलक्ष्मी या कंपन्यांमध्ये अभियंता असलेल्या युवतींनाही रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या मुलीदेखील पुरुषांच्या तुलनेत कुठेच मागे नाहीत. त्यामुळे कामगारांचे हित आणि भविष्य हे कसे उज्ज्वल राहील, यावरच आपला भर असतो. तेवढ्याच तन्मयतेने कामगारही आमच्यावर विश्वास ठेवून उत्पादन आणि दर्जा राखत असल्यानेच आज स्टील उद्योगामध्ये एक स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून आम्ही उदयास आलो

आहोत.

- सतीश अग्रवाल,

संचालक पोलाद स्टील, जालना

०००००००००००

कायदे महत्त्वाचे

कामगार कल्याणार्थ शासन अनेक कायदे करत आहेत. परंतु सध्या कामगारांच्या हिताऐवजी भांडवलशाहीचे हित जपले जात आहे. याचा धोरणात्मक विचार केंद्र आणि राज्य सरकारने करून कामगारांना जास्तीतजास्त संरक्षण आणि अन्य लाभ कसा मिळेल, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने गंभीर व्हावे.

- संजय देशपांडे

——————————-

पाठपुरावा गरजेचा

कामगारांसाठी कायदे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करताना यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे. यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित येऊन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ५० टक्के का होईना वेतन आयोगासह सेवानिवृत्तीवेतन मिळाल्यास वृद्धापकाळात त्याचा लाभ होऊ शकतो.

- गाेविंद पाचपोर

———————————————————-

संघटन महत्त्वाचे

कामगार एकजूट असल्याशिवाय कुठल्याही मागण्या मान्य होत नाहीत. मग तो व्यवसाय खाजगी असो की, सरकारी किंवा निमसरकारी येथे कामगारांना नेहमीच दुर्लक्षिले जाते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. या मागण्या अवाजवी नसाव्यात.

- गोविंद कळकटे

——————————————————-

संरक्षणाची गरज

कामगार हा देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावतो. आज संघटित आणि असंघटित असा कामगारवर्ग विखुरलेला आहे. त्यामुळे काेरोना काळ लक्षात घेऊन कामगारांसह त्यांच्या सर्व कुटुंबाची आरोग्य संदर्भातील जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापनाने घेतल्यास मोठा दिलासा मिळू शकेल.

- शिवाजी तेलंग्रे

————————————————————

वेतनवाढ मिळावी

आदर्श कामगारांना केवळ पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन सरकारने थांबू नये. वेतनवाढ देताना आदर्श कामगारांचा विचार होऊन विशेष वेतनवाढीची तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आदर्श शिक्षकांना जि.प.कडून वेतनवाढ मिळते, त्याच धर्तीवर सरकारने अन्य कामगारांनाही ती देण्याची गरज आहे.

- विजय देशपांडे