शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्यात चार पटीने, तर गव्हाच्या पेरणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी विष्णू वाकडे जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा ...

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी

विष्णू वाकडे

जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा फायदा रबी हंगामाला झाला असून, यंदा तब्बल ४३,५७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १८,८९० हेक्टरवर, तर गव्हाची ८,७९६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुबलक पाण्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत १७ हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यात सरासरी २५,७६६ हेक्टवर रबीची पेरणी होते. यंदा मात्र, मुबलक पाण्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले व तलाव तुडुंब भरले. पावसामुळे खरीप वाया गेल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष रबी हंगामाकडे होते. शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने रबी हंगामात पिकांची पेरणी केली. त्यामुळेच यंदा रबीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यात ८,७९६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत गव्हाच्या पेऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे हरभऱ्याची, तर विक्रमी पेरणी झाली आहे. ४,२०६ हेक्टर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असते. यंदा तब्बल १८,८९० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सध्या दोन्ही पिके जोमात असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. साळेगाव घारे येथील प्रगतिशील शेतकरी संदीप घारे यांनी सांगितले की, खरिपात काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामातील पिकांची पेरणी केली असून, शेतकऱ्यांना आता चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व्यवसाय सुकर होत असला तरी खर्च वाढत असल्याचे हिवरा रोशनगाव येथील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांनी सांगितले.

चौकट

यंदा रबी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून योग्य पाणी व्यवस्थापन करावे. पिकाची काढणी, कापणी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. पुढच्या वर्षीसाठी लागणारे बियाणे घरच्या घरी तयार करून ठेवावे.

-संतोष गाडे, तालुका कृषी अधिकारी, जालना