शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कृउबात चार कोटींची कोष खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:55 IST

जालना बाजार समितीने राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ सुरू करून वर्ष लोटले आहे. या वर्षभरात चार कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना बाजार समितीची ओळख ही मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पूर्वी केवळ भुसार मालाची मोठी बाजारपेठ म्हणून होती. येथे रोखीने व्यवहार होत असल्याने शेतकरी, व्यापारी जालन्याला प्राधान्य देतात. या प्रमाणेच आता जालना बाजार समितीने राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ सुरू करून वर्ष लोटले आहे. या वर्षभरात चार कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. भविष्यात जालन्यातील रेशीम बाजारपेठ ही कर्नाटक राज्यातील रामनगरम्लाही मागे टाकेल असा विश्वास बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.ते शनिवारी बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. खोतकर म्हणाले की, जालना बाजार समितीची एक गौरवशाली परंपरा आहे. येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांमधील समन्वय हा निश्चित प्रेरणा देणार आहे. कुठल्याच मुद्यावरून जालन्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याचे आपल्या आठवणीत नसल्याचे खोतकर म्हणाले. वर्षभरापूर्वी आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेऊन राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी येथे सुरू केली. यातून जवळपास चार कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रेशीम दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपसभापती भास्कर दानवे, संचालक रामेश्वर भांदरगे, वसंत जगताप, श्रीकांत घुले, सुभाष बोडखे, बाबूराव खरात, तुळशीराम काळे, भागवत वावणे, अनिल सोनी, रमेश तोतला. भाऊसाहेब घुगे, रावसाहेब मोठे, प्रल्हाद मोरे, विष्णू चंद, कैलास काजळकर, कमलाकर कळकुंबे, गोपाल काबलिये, शिवराम बोचरे, बद्रीनाथ पठाडे, भीमराव भुजंग, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी केले. यावेळी शेतकरी, व्यापारी आणि बदनापूर तालुक्यातील सर्व संचालक उपस्थित होते.‘रेशीम’साठी स्वतंत्र बाजारपेठरेशीमसाठी आता सहा कोटी रूपये खर्च करून इन्कम टॅक्स भवनजवळ स्वतंत्र इमारत उभी राहणार असल्याचे ते म्हणाले.दुष्काळातही शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन धान्य तारण योजनेसह अन्य विविध उपाययोजना आम्ही शेतक-यांचे हित लक्षात घेऊन राबविल्याचा दावा सभापती खोतकरांनी केला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकर