शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:13 IST

शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना : बहुचर्चित परभणी ते छत्रपती संभाजीनगररेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने २ हजार १७९ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे; परंतु जालना जिल्ह्यात अद्याप दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अंकाई ते परभणी हा रेल्वे मार्ग ‘सिंगल लाइन’ रेल्वे मार्ग होता. अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला २०२३ च्या मे महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाच्या कामासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी. यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २ हजार १७६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

जमीन संपादनाची प्रक्रिया नाहीपरभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. जालना जिल्ह्यातून सुमारे ७० किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. जालना जिल्ह्यातील जालना, घनसावंगी, परतूर व बदनापूर या तालुक्यांतून रेल्वे मार्ग जातो. या रेल्वे मार्गावर जालना, परतूर, रांजणी, बदनापूर अशी महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. मागील वर्षी दक्षिण मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. यात जालना, परतूर आणि अंबड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर अधिसूचनेद्वारे भूसंपादनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मात्र, नेमकी जमीन कोणती संपादित करायची याविषयीची अधिसूचना अद्याप रेल्वेकडून प्रकाशित करण्यात आलेली नाही. ही अधिसूचना काढल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुहेरी मार्गासाठी २०२७ उजाडणारपरभणी ते छत्रपती संभाजीनगर हा सिंगल ट्रॅकचा रेल्वे मार्ग आहे. याच ट्रॅकवरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वे धावतात. यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यात दक्षिण मध्य रेल्वे उत्सुक नसते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर अनेक जलदगती रेल्वेसह गाड्यांची संख्या वाढणार आहे. नांदेड ते परभणी मार्गावरील दुहेरीकरण यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आता परभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरीकरणास मार्गास मंजुरी देण्यात आलेली आहे. हा मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर