शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'मिआ बाय तनिष्क'च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
4
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
6
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
7
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
8
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
9
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
10
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
11
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
12
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
13
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
14
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
15
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
16
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
17
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
18
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
19
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
20
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:13 IST

शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना : बहुचर्चित परभणी ते छत्रपती संभाजीनगररेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने २ हजार १७९ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे; परंतु जालना जिल्ह्यात अद्याप दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अंकाई ते परभणी हा रेल्वे मार्ग ‘सिंगल लाइन’ रेल्वे मार्ग होता. अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला २०२३ च्या मे महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाच्या कामासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी. यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २ हजार १७६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

जमीन संपादनाची प्रक्रिया नाहीपरभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. जालना जिल्ह्यातून सुमारे ७० किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. जालना जिल्ह्यातील जालना, घनसावंगी, परतूर व बदनापूर या तालुक्यांतून रेल्वे मार्ग जातो. या रेल्वे मार्गावर जालना, परतूर, रांजणी, बदनापूर अशी महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. मागील वर्षी दक्षिण मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. यात जालना, परतूर आणि अंबड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर अधिसूचनेद्वारे भूसंपादनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मात्र, नेमकी जमीन कोणती संपादित करायची याविषयीची अधिसूचना अद्याप रेल्वेकडून प्रकाशित करण्यात आलेली नाही. ही अधिसूचना काढल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुहेरी मार्गासाठी २०२७ उजाडणारपरभणी ते छत्रपती संभाजीनगर हा सिंगल ट्रॅकचा रेल्वे मार्ग आहे. याच ट्रॅकवरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वे धावतात. यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यात दक्षिण मध्य रेल्वे उत्सुक नसते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर अनेक जलदगती रेल्वेसह गाड्यांची संख्या वाढणार आहे. नांदेड ते परभणी मार्गावरील दुहेरीकरण यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आता परभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरीकरणास मार्गास मंजुरी देण्यात आलेली आहे. हा मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर