शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:31 IST

परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परतीच्या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली असून, नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांना ५० हजत्तर रुपये हेक्टरी मदत द्यावी नसता त्याचे परिणाम भोगावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाने काही दखल घेतली का ? अशी विचारणा केली. महसूल अधिकारी फिरकलेच नसल्याचे व मदतीसंदर्भात कोणी ‘ब्र’ शब्द काढत नाही, असे ग-हाणे शेतक-यांनी माडंले. त्यावर शेट्टी यांनी प्रशासनाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. शेतक-यांवर अन्याय होत असेल तर आम्ही कदापी गप्प बसणार नाही. शेतक-यांनी चिंता करु नये, असेही ते म्हणाले. शेट्टी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संर्पक साधला. मात्र, जिल्हाधिकारी बाहेर असल्यामुळे चर्चा झाली नाही. त्यानंतर उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी हजर होते. यावेळी स्थानिक अधिका-यांकडूनही शेट्टी यांनी माहिती जाणून घेतली.निद्रिस्त सरकार : सर्वांना मदत मिळावीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी मंगळवारी जालन्यात काही काळ थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला होता, तर आता त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. शेतक-यांवरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाही.असे असले तरी सरकार केवळ कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शेतकरी हलवादिल झाला असताना केवळ दौरे करून त्याला दिलासा दिला जात आहे. अद्याप शिवसेना आणि भाजपने सरकार स्थापनेचा दावाही केला नाही तर विरोधकांनी पुढे येण्याची गरजही शेट्टी यांनी वर्तविली. यावेळी त्यांच्यासमवेत साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी या पदाधिका-यांची उपस्थिती होती.याविषयी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव यांनी सागिंतले की, अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहमुळे बंधाºयाचे पाणी एका बाजूने जाऊन जमिनी वाहिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती म्हणून ही घटना दुर्दैवी आहे. तरी सुद्धा शेतक-यांना मदतीसाठी तात्काळ पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस