शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

उपचारासाठी आंदोलकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची ...

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून उपचारासाठी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्यत खालवली आहे. यात ६५ वर्षीय मुक्ताबाई ढेपे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य यांचा समावेश आहे. पैकी मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य यांची दि. २८ जानेवारी रोजी प्रकृती खालावली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वत: येऊन त्यांची तपासणी केली. मात्र दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपोषणकर्ते बाबासाहेब वैद्य यांचा बीपी वाढल्याने त्यांना तातडीने शहागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे व संबंधित महिलेने उपचार घेण्यात नकार दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सर्व संसारच आंदोलनस्थळी

मागील नऊ दिवसांपसून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू असून, तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र सरकारने दखल न घेतल्याने २९ जानेवारी रोजी महिलांनी आपली चूल, गॅससह आपला संसारच आंदोलनस्थळी आणला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

मराठा समाजास न्याय मिळेल : खोतकर

आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पिछेहट झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ओबीसींचे नको तर स्वतंत्ररित्या आरक्षण द्यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका राहिली आहे. साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण स्वत: पोहोचविणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मराठा समाजास न्याय मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांशी संवाद साधताना व्यक्त केला.