शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

उपचारासाठी आंदोलकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची ...

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून उपचारासाठी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्यत खालवली आहे. यात ६५ वर्षीय मुक्ताबाई ढेपे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य यांचा समावेश आहे. पैकी मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य यांची दि. २८ जानेवारी रोजी प्रकृती खालावली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वत: येऊन त्यांची तपासणी केली. मात्र दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपोषणकर्ते बाबासाहेब वैद्य यांचा बीपी वाढल्याने त्यांना तातडीने शहागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे व संबंधित महिलेने उपचार घेण्यात नकार दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सर्व संसारच आंदोलनस्थळी

मागील नऊ दिवसांपसून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू असून, तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र सरकारने दखल न घेतल्याने २९ जानेवारी रोजी महिलांनी आपली चूल, गॅससह आपला संसारच आंदोलनस्थळी आणला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

मराठा समाजास न्याय मिळेल : खोतकर

आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पिछेहट झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ओबीसींचे नको तर स्वतंत्ररित्या आरक्षण द्यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका राहिली आहे. साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण स्वत: पोहोचविणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मराठा समाजास न्याय मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांशी संवाद साधताना व्यक्त केला.