शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी आंदोलकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची ...

वडीगोद्री : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेल्या एका वयोवृद्ध महिलेसह इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून उपचारासाठी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्यत खालवली आहे. यात ६५ वर्षीय मुक्ताबाई ढेपे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य यांचा समावेश आहे. पैकी मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य यांची दि. २८ जानेवारी रोजी प्रकृती खालावली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वत: येऊन त्यांची तपासणी केली. मात्र दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपोषणकर्ते बाबासाहेब वैद्य यांचा बीपी वाढल्याने त्यांना तातडीने शहागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे व संबंधित महिलेने उपचार घेण्यात नकार दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सर्व संसारच आंदोलनस्थळी

मागील नऊ दिवसांपसून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू असून, तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र सरकारने दखल न घेतल्याने २९ जानेवारी रोजी महिलांनी आपली चूल, गॅससह आपला संसारच आंदोलनस्थळी आणला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

मराठा समाजास न्याय मिळेल : खोतकर

आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पिछेहट झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ओबीसींचे नको तर स्वतंत्ररित्या आरक्षण द्यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका राहिली आहे. साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण स्वत: पोहोचविणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मराठा समाजास न्याय मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांशी संवाद साधताना व्यक्त केला.