शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी योजनेचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:41 IST

राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे. हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात नानाजी देशमुख प्रकल्प संचालकांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही सूचना दिली आहे.राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासह शेतीला पुरेसे पाणी मिळावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाची कामे प्राधान्यने करण्याचे नियोजन आहे. यासाठी या जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून निधीही मिळाला आहे. असे असताना सूक्ष्म पातळीवर जाऊन हे प्रस्ताव प्रशासनाने पूर्ण करणे अपेक्षित होते.एकूणच नानाजी देशमुख कृषी संजवनी योजनेतून जलसंधारणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कृषी, तसेच तलसंधारण विभागाने एकत्रित येऊन हे प्रस्ताव तयार करावयाचे आहेत. परंतु अशी संयुक्त कामे ही समन्वयाने होत नसल्याने ही महत्वाची योजना बारगळली आहे. या योजनेतून जी गावे पहिल्या टप्प्यात निवडली आहेत, त्यांचे डीपीआर तातडीने सादर करण्या बाबत यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. परंतु दुष्काळातही याकडे प्रशासनाने गंभीरतेने घेतले नाही.परतूर, जालना पिछाडीवरनानाजी देशमुख संजीवनी योजने अंतर्गत जालना आणि परतूर तालुक्यातील प्रस्तावही अपूर्ण आहेत. त्यात जालना तालुक्यातून १३ आणि परतूर तालुक्यातून जवळपास ५४ प्रस्ताव रखडले आहेत. यासाठी अनुक्रमे २४ कोटी ४८ लाख आणि परतूर तालुक्यासाठी अंदाजे १७ कोटी रूपये मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. हे प्रस्ताव पंधरा ते वीस दिवसात सादर करावेत असे प्रकल्प संचालकांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प