शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

उत्पादनाचा खर्च वाढला; मात्र उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:42 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढत असून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत चालले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढत असून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी होत आहे़केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे दिवसेंदिवस खत कंपन्यांकडून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत आहे़ सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रूपये भाववाढ झाली आहे़ यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामासाठी शेतक-यांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत.दरवर्षी शेतकरी उन्हाळ््याच्या शेवटी खतांची निवड करून त्याची खरेदी सुरू करीत असतात. मात्र, यावर्षी खतांची भरमसाठ भाववाढ झाल्यामुळे शेतक-यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही. या दरवाढीमुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असून शेतक-यांपुढे आता दुष्काळानंतर खत दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.त्यासाठी शेतक-यांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतक-यांमधूून होत आहे़शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतक-यांना खताचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.मोफत खतपुरवठा करावाया तालुक्यात सध्या पिण्याचे पाणी टंचाई, चारा टंचाई यासोबतच शेतीच्या पाण्याची टंचाईसुध्दा तीव्र प्रमाणात आहे. शेतीत पाणी नसल्यामुळे शेतकºयांना यावर्षी खरीप व रबीची पिके घेता आली नाहीत. जी थोडीफार पिके आली त्या पिकाला लागलेला खर्चही यातून निघालेला नाही. तसेच तालुक्यात असलेल्या मोसंबी, डाळींब अशा अनेक फळबागाही पाणी नसल्यामुळे नष्ट होत आहेत.या फळबागांमधून शेतक-यांना मिळणारे लाखो रूपयांचे उत्पन्न आता मिळणार नाही. अशा प्रकारे तालुक्यात शेतक-यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न तर मिळालेच नाही. शेतीची मशागत, पेरणी, खते, कीटकनाशके अशा विविध बाबींसाठी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ अशा प्रकारे यावर्षीच्या दुष्काळाने शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतक-यांना येणा-या खरीप हंगामासाठी बियाणे, खत, कीटकनाशके कशी खरेदी करणार, ही चिंता लागली आहे. त्यातच आता येणाºया खरीप हंगामासाठी लागणा-या  खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे़अनेक खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचाही खतसाठा शिल्लक आहे. हा जुन्या किंमतीचा खतसाठा नवीन किंमतीत शेतक-यांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी निरक्षर असतात. त्यांना खतांचे दर वाढले एवढेच माहिती असते. परंतु, आपण घेतलेल्या खताच्या गोणीवर किती किंमत आहे हे निरक्षर शेतक-यांना माहिती नसते, त्यांना जुन्या खताच्या गोणीचाच नवीन दराने विक्री होवू शकते.कृषी विभागाने ज्या खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचे खत आहे. तेच खत सुरूवातीला विक्री करण्याचे व त्याचा अहवाल पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ दुकानात जुन्या दराचे खत असताना नवीन दराचे खत विक्री होऊ नये व जुन्या दराचे खत नवीन दरात विक्री होणार नाही. याकरीता भरारीपथकाची नेमणूक करून शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार