शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाचा खर्च वाढला; मात्र उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:42 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढत असून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत चालले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढत असून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी होत आहे़केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे दिवसेंदिवस खत कंपन्यांकडून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत आहे़ सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रूपये भाववाढ झाली आहे़ यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामासाठी शेतक-यांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत.दरवर्षी शेतकरी उन्हाळ््याच्या शेवटी खतांची निवड करून त्याची खरेदी सुरू करीत असतात. मात्र, यावर्षी खतांची भरमसाठ भाववाढ झाल्यामुळे शेतक-यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही. या दरवाढीमुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असून शेतक-यांपुढे आता दुष्काळानंतर खत दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.त्यासाठी शेतक-यांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतक-यांमधूून होत आहे़शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतक-यांना खताचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.मोफत खतपुरवठा करावाया तालुक्यात सध्या पिण्याचे पाणी टंचाई, चारा टंचाई यासोबतच शेतीच्या पाण्याची टंचाईसुध्दा तीव्र प्रमाणात आहे. शेतीत पाणी नसल्यामुळे शेतकºयांना यावर्षी खरीप व रबीची पिके घेता आली नाहीत. जी थोडीफार पिके आली त्या पिकाला लागलेला खर्चही यातून निघालेला नाही. तसेच तालुक्यात असलेल्या मोसंबी, डाळींब अशा अनेक फळबागाही पाणी नसल्यामुळे नष्ट होत आहेत.या फळबागांमधून शेतक-यांना मिळणारे लाखो रूपयांचे उत्पन्न आता मिळणार नाही. अशा प्रकारे तालुक्यात शेतक-यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न तर मिळालेच नाही. शेतीची मशागत, पेरणी, खते, कीटकनाशके अशा विविध बाबींसाठी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ अशा प्रकारे यावर्षीच्या दुष्काळाने शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतक-यांना येणा-या खरीप हंगामासाठी बियाणे, खत, कीटकनाशके कशी खरेदी करणार, ही चिंता लागली आहे. त्यातच आता येणाºया खरीप हंगामासाठी लागणा-या  खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे़अनेक खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचाही खतसाठा शिल्लक आहे. हा जुन्या किंमतीचा खतसाठा नवीन किंमतीत शेतक-यांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी निरक्षर असतात. त्यांना खतांचे दर वाढले एवढेच माहिती असते. परंतु, आपण घेतलेल्या खताच्या गोणीवर किती किंमत आहे हे निरक्षर शेतक-यांना माहिती नसते, त्यांना जुन्या खताच्या गोणीचाच नवीन दराने विक्री होवू शकते.कृषी विभागाने ज्या खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचे खत आहे. तेच खत सुरूवातीला विक्री करण्याचे व त्याचा अहवाल पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ दुकानात जुन्या दराचे खत असताना नवीन दराचे खत विक्री होऊ नये व जुन्या दराचे खत नवीन दरात विक्री होणार नाही. याकरीता भरारीपथकाची नेमणूक करून शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार