शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:53 IST

यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हंगामापूर्वीच खत उत्पादन कंपन्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.जिल्ह्यात सलग चार वर्षापासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण आहेत. यामुळे शेतीच्या व्यवसाय आर्थिक आतबट्ट्यात ठरत आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतीत लावलेला खर्चही हाती पडलेला नाही. यामुळे शेतक-याचा वर्षभराचा हिशोब बिघडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करुन चांगलाच धक्का दिला आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतक-यांच्या खिशाला न परवडणारी आहे.५० किलो वजनाच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यत वाढ करण्यात आल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.गतवर्षी शेतक-यांना या खताची बॅग केवळ ९९७ रुपयांत मिळत असे आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच एका बॅगमागे १०३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.दुष्काळ आणि नापिकीसारख्या संकाटामध्ये पिचलेल शेतक-यांना खताच्या दरमध्ये वाढ केल्याने शेतक-यात संताप आहे.याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.डीएपी खताच्या एकाबॅगेसाठी पूर्वी १ हजार २८० रुपये मोजावे लागत होेते. आता शेतकºयांना डीएपी च्या एका बॅगेसाठी १ हजार ४७७ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतक-यांच्या खिशाला १९७ रुपयांची जास्तीची झळ बसणार आहे.४१०: २६ : २६ या खताची बॅग गतवर्षी शेतक-यांना १ हजार १८३ रुपयांना मिळत असे आता १ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.४म्हणजेच एक बॅगमागे २१७ रुपयांची वाढ झाली. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीEconomyअर्थव्यवस्था