शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्ण वाऱ्यावर; आरोग्य विभागाकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ...

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचीही उदारहणे आहेत. असे असतानाही एकदा रूग्ण बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रूग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पोस्ट कोविडमुळेही रूग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात १२ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रूग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची काळजी घेणे गरजेचे असतानाही आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली नाही. अनेकांना थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रूग्ण वाऱ्यावर

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, सध्या हे पोस्ट कोविड सेंटर नावालाच सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाऱ्यावरच आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असतानाही अधिकारी पोस्ट कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष करीत आहे.

ओपीडी सुरू

आम्ही शासकीय रूग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, रूग्ण येत नाही. रूग्णांना डिस्चार्ज देतेवेळी काही थकवा जाणवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता पोस्ट कोविड रूग्णांशी संपर्क केला जाईल. काही त्रास जाणवल्यास संपर्क करावा.

- अर्चना भोसले,

जिल्हा शल्य चिकित्सक