शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्ण वाऱ्यावर; आरोग्य विभागाकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ...

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचीही उदारहणे आहेत. असे असतानाही एकदा रूग्ण बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रूग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पोस्ट कोविडमुळेही रूग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात १२ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रूग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची काळजी घेणे गरजेचे असतानाही आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली नाही. अनेकांना थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रूग्ण वाऱ्यावर

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, सध्या हे पोस्ट कोविड सेंटर नावालाच सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाऱ्यावरच आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असतानाही अधिकारी पोस्ट कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष करीत आहे.

ओपीडी सुरू

आम्ही शासकीय रूग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, रूग्ण येत नाही. रूग्णांना डिस्चार्ज देतेवेळी काही थकवा जाणवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता पोस्ट कोविड रूग्णांशी संपर्क केला जाईल. काही त्रास जाणवल्यास संपर्क करावा.

- अर्चना भोसले,

जिल्हा शल्य चिकित्सक