शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्ण वाऱ्यावर; आरोग्य विभागाकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ...

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचीही उदारहणे आहेत. असे असतानाही एकदा रूग्ण बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रूग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पोस्ट कोविडमुळेही रूग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात १२ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रूग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची काळजी घेणे गरजेचे असतानाही आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली नाही. अनेकांना थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रूग्ण वाऱ्यावर

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, सध्या हे पोस्ट कोविड सेंटर नावालाच सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाऱ्यावरच आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असतानाही अधिकारी पोस्ट कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष करीत आहे.

ओपीडी सुरू

आम्ही शासकीय रूग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, रूग्ण येत नाही. रूग्णांना डिस्चार्ज देतेवेळी काही थकवा जाणवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता पोस्ट कोविड रूग्णांशी संपर्क केला जाईल. काही त्रास जाणवल्यास संपर्क करावा.

- अर्चना भोसले,

जिल्हा शल्य चिकित्सक