शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

सहा महिन्यांत जालना पोलिसांनी शोधले २५२ मोबाईल; तक्रारदार समाधानी

By विजय मुंडे  | Updated: December 21, 2023 19:27 IST

कायदेशीर प्रक्रियेनंतर ते मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.

जालना : केंद्र शासनाच्या दूरसंचार व दळणवळण विभागाच्या वतीने हरवलेले, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. त्याचा वापर करीत सायबर पोलिसांसह विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेत सहा महिन्यांत २५२ मोबाईल शोधले आहेत. शोधलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलबाबत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध पोलिस ठाण्यात मोबाईल हरवलेले, चोरीस गेलेल्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोर्टलचा आधार घेत तांत्रिक पद्धतीने शोध घेवून सहा महिन्यात २५२ मोबाईल जप्त केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर ते मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल शोधण्यामध्ये सायबर पोलिस ठाणे आघाडीवर आहे.

सायबर पाेलिसांनी शोधलेले मोबाईल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते तक्रारदारांना देण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. संभाजी वडते, सफौ. पाटोळे, पोहेकॉ. राठोड, हिवाळे, निकम, मांटे, भवर, गुसिंगे, मुरकुटे, पालवे, नागरे, दुनगहू आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना