शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

गेला मव्हा जीव.. मले भिंतीला खुटवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:44 IST

गेला मव्हा जीव... मले भिंतीला खुटवा.... सोन्याचं पिंपळ पानं... माज्या माहेरी पाठवा... कवी नारायण पुरीच्या विरह स्वरातील कवितेच्या या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण काही वेळ भावूक बनले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : गेला मव्हा जीव... मले भिंतीला खुटवा.... सोन्याचं पिंपळ पानं... माज्या माहेरी पाठवा... कवी नारायण पुरीच्या विरह स्वरातील कवितेच्या या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण काही वेळ भावूक बनले होते. निमित्त होते डावरगाव देवी येथील जगदंबा देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत आयोजित नक्षत्र काव्य मैफलीचे. शुक्रवारी रात्री येथील देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात झालेल्या या काव्य मैफलीत प्रथमत:च ग्रामीण भागातील श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे पाहावयास मिळाले.जालना जेईएस महाविद्यालयाचे डॉ. यशवंत सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य मैफिलीत कवी नारायण पुरी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, समाधान इंगळे, कृष्णा वाघ या चार कवींनी एक से बढकर एक अशा कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.नारायण पुरीच्या प्रेमाचा जांगडगुत्ता व काटा या कवितांना तर श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.तब्बल तीन तास चाललेल्या या काव्य मैफलीस सरपंच अनिल नवले, माजी सरपंच सुभाष नवले, शिक्षक नेते संजय लहाने, शाहीर कृष्णा इंगळे, विष्णू वराडे, सैलीप्रकाश वाघमारे, दिनकर ससाने, अलकेश सोमाणी, नसीम शेख, सुरेश बोर्डे, गोविंद जाधव, धनंजय निकम, दगडूबा देठे, सुखदेव नवले, दत्तात्रय देठे, प्रभू गाढे, गजानन नवले, साहेबराव नवले, समाधान नवले, दत्तू नवले, विष्णू नवले, प्रताप नवले, दीपक नवले, त्र्यंबक नवले, गणपत लोखंडे, योगेश देठे व श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.संजीवनी तडेगावकर यांनी अस्सल ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर केल्या. जिवा लागे हुरहूर गोड स्वरात गायलेल्या या कवितेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कवी कृष्णा वाघ यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचं वास्तव सांगणारी कविता सादर केली. तर समाधान इंगळे यांनी गायलेल्या असेच डोळे मिटुनी ठेवले तर... तांबडं फुटणारच नाही.. या कवितेसह आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने श्रोत्यांची वाहवा मिळविली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक