शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर

By महेश गायकवाड  | Updated: June 17, 2023 16:40 IST

२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.

जालना : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात २० व २१ जून रोजी गावोगावी कृषी सहायकांमार्फत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थी शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेतील स्थिती तपासून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. या शिबिरात कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सीएससी केंद्राचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. राज्यात लाखो शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्नीत करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. जालना जिल्ह्यात केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६४ हजार ९९२ तर आधार लिंक न केलेल्यांची संख्या ३० हजार ९७५ आहे. या सर्व लाभार्थींची यादी कृषी सहायकांना वाटप करण्यात आली आहे. प्रत्येक गावात होणाऱ्या शिबिराबाबत नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रचार- प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधान