शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

खेळाडूंना घरच्या डब्याचा आधार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:52 IST

आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली. शासनस्तरावरूनच अपुरा निधी येत असल्याने जेवणासह इतर सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे घरचा डबा खाऊनच विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवरही कसब पणाला लावावे लागते.जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर १६ व १७ आॅक्टोबर रोजी विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. या क्रीडा स्पर्धेत जालन्यासह औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली या पाच जिल्ह्यातील शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, नेहमीप्रमाणे स्पर्धेच्या वेळी मुक्कामाची सोय होणे अपेक्षित नसल्याने अनेक शिक्षकांनी खाजगी वाहनातून १२५ ते १५० किलोमीटर अंतरावरून खेळाडूंना आणले होते. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या आवारात दोन दिवस खासगी वाहनांची गर्दी दिसून आली. त्यात अपुऱ्या निधीमुळे जेवणाची सोय उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे विभागीय स्पर्धेच्या दरम्यान जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया खेळाडूंसह शिक्षकांना मिळालेल्या वेळेत घरून आणलेल्या डब्याचाच आधार घ्यावा लागला.जालना येथील क्रीडा संकुलाची डागडुजीही रखडली आहे. थोडाही पाऊस झाला की, मैदानावर चिखल होतो. काही भागांत पाणी साचते. सुदैवाने दोन दिवसात पाऊस झाला नसल्याने विभागीय स्पर्धेतील खेळाडूंना आपले कसब पणाला लावता आले. मात्र, जेथे रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते. तेथे काही भागात खडी मोठ्या प्रमाणात होती. अनेक खेळाडू विशेषत: मुलीही अनवाणी पायाने जिंकण्यासाठी धावत होत्या. ही खडी तुडवत आणि त्या खडीचा त्रास सहन करीतच अनेकांनी जिंकण्यासाठी कसब पणाला लावले. दुसरीकडे क्रॉस कंट्रीत एकाच वयोगटात खेळाडूने वर्षभर खेळायचे, या नियमावरूनही बुधवारी काहीसा संभ्रम प्रशिक्षक आणि आयोजकांमध्ये झाल्याचे दिसून आले. एकूणच क्रीडा विभागाकडूनच अपुºया प्रमाणात निधी दिला जात असल्याने खेळाडूंना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. त्यामुळे पदकांची अपेक्षा करायची किती आणि ही पदके मिळणार कशी, असाच प्रश्न क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.क्रीडा धोरण कागदावरदर्जेदार खेळाडू घडावेत, खेळाडूंना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी क्रीडा धोरण जोमात राबविले जाते.मात्र, स्थानिक पातळीवरील क्रीडा संकुल असोत किंवा खेळाडूंना मिळणा-या सोयी-सुविधा असोत, या बाबी पाहता क्रीडा धोरण केवळ कागदावरच राहत असल्याचे चित्र प्रत्येक जिल्ह्यात आहे.जिल्हा क्रीडा संकुलाचीच वाट लागलेली आहे. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलावरील परिस्थितीचा विचार न केलेलाच बरा ! अशीच स्थिती जालना जिल्ह्यातही आहे.केवळ तीन प्रकारांत भागअनेक मैदानी, सांघिक स्पर्धेत गुणवत्ता सिध्द करण्याचे कसब खेळाडूकडे असले तरी त्याला केवळ तीनच क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याचा नियम आहे. त्यामुळे क्षमता असूनही अनेक खेळाडू इतर क्रीडा प्रकारात किचकट नियमामुळे सहभागी होऊ शकत नसल्याची खंत अनेक खेळाडू, शिक्षकांनी व्यक्त केली.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळाStudentविद्यार्थी