शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खेळाडूंना घरच्या डब्याचा आधार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:52 IST

आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली. शासनस्तरावरूनच अपुरा निधी येत असल्याने जेवणासह इतर सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे घरचा डबा खाऊनच विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवरही कसब पणाला लावावे लागते.जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर १६ व १७ आॅक्टोबर रोजी विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. या क्रीडा स्पर्धेत जालन्यासह औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली या पाच जिल्ह्यातील शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, नेहमीप्रमाणे स्पर्धेच्या वेळी मुक्कामाची सोय होणे अपेक्षित नसल्याने अनेक शिक्षकांनी खाजगी वाहनातून १२५ ते १५० किलोमीटर अंतरावरून खेळाडूंना आणले होते. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या आवारात दोन दिवस खासगी वाहनांची गर्दी दिसून आली. त्यात अपुऱ्या निधीमुळे जेवणाची सोय उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे विभागीय स्पर्धेच्या दरम्यान जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया खेळाडूंसह शिक्षकांना मिळालेल्या वेळेत घरून आणलेल्या डब्याचाच आधार घ्यावा लागला.जालना येथील क्रीडा संकुलाची डागडुजीही रखडली आहे. थोडाही पाऊस झाला की, मैदानावर चिखल होतो. काही भागांत पाणी साचते. सुदैवाने दोन दिवसात पाऊस झाला नसल्याने विभागीय स्पर्धेतील खेळाडूंना आपले कसब पणाला लावता आले. मात्र, जेथे रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते. तेथे काही भागात खडी मोठ्या प्रमाणात होती. अनेक खेळाडू विशेषत: मुलीही अनवाणी पायाने जिंकण्यासाठी धावत होत्या. ही खडी तुडवत आणि त्या खडीचा त्रास सहन करीतच अनेकांनी जिंकण्यासाठी कसब पणाला लावले. दुसरीकडे क्रॉस कंट्रीत एकाच वयोगटात खेळाडूने वर्षभर खेळायचे, या नियमावरूनही बुधवारी काहीसा संभ्रम प्रशिक्षक आणि आयोजकांमध्ये झाल्याचे दिसून आले. एकूणच क्रीडा विभागाकडूनच अपुºया प्रमाणात निधी दिला जात असल्याने खेळाडूंना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. त्यामुळे पदकांची अपेक्षा करायची किती आणि ही पदके मिळणार कशी, असाच प्रश्न क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.क्रीडा धोरण कागदावरदर्जेदार खेळाडू घडावेत, खेळाडूंना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी क्रीडा धोरण जोमात राबविले जाते.मात्र, स्थानिक पातळीवरील क्रीडा संकुल असोत किंवा खेळाडूंना मिळणा-या सोयी-सुविधा असोत, या बाबी पाहता क्रीडा धोरण केवळ कागदावरच राहत असल्याचे चित्र प्रत्येक जिल्ह्यात आहे.जिल्हा क्रीडा संकुलाचीच वाट लागलेली आहे. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलावरील परिस्थितीचा विचार न केलेलाच बरा ! अशीच स्थिती जालना जिल्ह्यातही आहे.केवळ तीन प्रकारांत भागअनेक मैदानी, सांघिक स्पर्धेत गुणवत्ता सिध्द करण्याचे कसब खेळाडूकडे असले तरी त्याला केवळ तीनच क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याचा नियम आहे. त्यामुळे क्षमता असूनही अनेक खेळाडू इतर क्रीडा प्रकारात किचकट नियमामुळे सहभागी होऊ शकत नसल्याची खंत अनेक खेळाडू, शिक्षकांनी व्यक्त केली.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळाStudentविद्यार्थी