शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

औरंगाबादेत पीटलाइन नावालाच मंजूर, जालन्याने पकडली ‘स्पीड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 13:52 IST

जालन्यात कोच देखभाल सुविधेच्या विकासासह इतर कामांची निविदा प्रक्रिया

औरंगाबाद : औरंगाबादेतील पीटलाइन नावालाच मंजूर असून, जालन्याने पीटलाइनच्या बाबतीत काहीशी गती पकडली आहे. जालन्यात कोच देखभाल सुविधेच्या विकासासह प्राथमिक विद्युत कामे, विद्युत युनिटचे स्थलांतर इ. कामांसाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध झाली.

औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाइनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाइन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाइन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतला. त्यापाठोपाठ चिकलठाण्यातच पीटलाइन व्हावी, या मागणीसाठी चिकलठाणा येथील ग्रामस्थही पुढे आले.

औरंगाबादेतील चिकलठाणा येथील पीटलाइन जालन्याला पळविण्यात येत असल्याची ओरड होत असताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा दिला. या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु प्रत्यक्षात औरंगाबादेत पीटलाइन होण्याच्या दृष्टीने कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याची ओरड होत आहे. दुसरीकडे जालन्यात कोच देखभाल, सुविधेच्या विकासासह प्राथमिक कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे.

आता औरंगाबादची पीटलाइन मार्गी लावाजालन्यात पीटलाइनच्या प्राथमिक कामकाजासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. जालन्यातील पीटलाइन मागणी मार्गी लागून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता औरंगाबादच्या पीटलाइनचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य द्यावे. औरंगाबादला त्याची गरज आहे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे