शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पेट्रालचे दर : तीन रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

सरकारचे नियंत्रण सुटले पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर सरकारचे नियंत्रण होते. मध्यंतरी हे सर्व नियंत्रण सरकारने हटवून ते तेल उत्पादक ...

सरकारचे नियंत्रण सुटले

पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर सरकारचे नियंत्रण होते. मध्यंतरी हे सर्व नियंत्रण सरकारने हटवून ते तेल उत्पादक कंपन्यांच्या हातात दिले. त्यामुळे या कंपन्या आपला नफा कसा वाढेल यावर भर देणार आहेत. त्यामुळे भविष्यात हे दर कमी होतील, अशी आशा करणे हे वेडेपणाचे ठरेल.

अशोक हुरगट

-----------------------------------------

कायद्याचा बडगा गरजेचा

आज भाव वाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे कंपन्या आपली मनमानी करतात. या सर्व तेल उत्पादक कंपन्यांवर कायद्याचा एक प्रकारे अंकुश असणे गरजेचे आहे. आज कितीही दर वाढले, तरी वाहन ही एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे सरकार भावाढीवर कायद्याने बंधन घालणार नाही, तोपर्यंत या तेल कंपन्या आपले धोरण बदलणार नाहीत.

ॲड. एस. एम. धन्नावत

--------------------------

वाहनांचे उत्पादन कमी करावे

पूर्वी आजच्या एवढी वाहने नव्हती. आज ही संख्या वेगाने वाढत आहे. यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्यास त्याचा मोठा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या मागणीवर होऊ शकतो. पूर्वी जालन्यात सिटीबस होत्या. त्यामुळे रिक्षांना एवढी मागणी नव्हती. परंतु आता नीवन जालना तसेच जुना जालना भागात जाण्यासाठी सामान्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. याचा विचार होणे गरजेचे आहे.

प्रकाश लड्डा

--------------------------------------------------------

वाहनांचा कमी वापर व्हावा

आज आपण कुठेही जायचे म्हटले की, कार अथवा दुचाकी वापरतो. परंतु पूर्वी आपण साधारणपणे चार ते पाच किलोमीटर चालत जात होतो. परंतु आता आपण घरापासून जवळ जरी जायचे म्हटले तरी गाडीवरून जात आहोत. ही सवय बदलणे गरजेचे आहे. यातून पर्यावरण रक्षण होऊन तेलाची मागणी आपोआप कमी होऊन भाव कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच खिशालाही कमी झळ बसू शकते.

गोपाल अग्रवाल

---------------

सामान्यांना मोठा फटका

पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती या गेल्या दशकात झपाट्याने वाढल्या आहेत. याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून जे कच्चे तेल मिळते ते महाग मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करून नंतर ते ग्राहकांना दिले जाते. त्यामुळे याचा मोठा फटका सामान्य माणसाला बसत आहे. महागाईत दिवसेंदिवस वाढ होणे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

विमल सिघवी

----------------------------

तीन रुपयांपासून दर पाहिले

आज कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. परंतु चाळीस वर्षांपूर्वी मी स्वत: तीन रुपये प्रतिलीटरने लुनात पेट्रोल टाकले आहे. आज हेच दर चक्क शंभरच्या घरात पोहोचल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारने ही बाब गंभीरतेने घेऊन हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

लक्ष्मीकांत कंकाळ

----------------------------------

सायकलचा वापर वाढवावा

पूर्वी जवळपास सर्वांकडेच सायकल होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलशी सामान्य माणसांचा संबंध नव्हता, परंतु जसे औद्योगिकीकरण वाढले. त्यानुसार वाहनांची संख्या आपोआपच वाढली आहे. त्याची आता आपल्या सर्वांना सवय लागली आहे. ती बदलून सायकलचा वापर वाढला पाहिजे. सायकल चालविणे हे आरोग्यासाठीदेखील एक उत्तम औषध आहे.

अनुप साहनी

----------------

रिफायनरी वाढवाव्यात

आज कच्चे तेल मोठ्या प्रमाणावर आपण आयात करतो. परंतु त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. त्यामुळे सरकारने पेट्रोल तसेच डिझेलचे उत्पादन करून ते विक्री करण्यासाठी सहज उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून आज असलेल्या कंपन्यांच्या मक्तेदारीला आळा बसेल.

मिठ्ठालाल सकलेचा

-------------------------------

महागाई वाढली

आज पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत आहे. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक महागली आहे. तुलनेने रेल्वे वाहतूक आणखी वाढविणे गरजेच आहे. परंतु ते सध्या शक्य नसल्याने किमान सर्वत्र दुहेरी रेल्वे मार्ग केल्यास त्याचा प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी चांगला उपयोग होईल. यामुळे वस्तुंच्या किमती नियंत्रणात राहतील.

डॉ. श्याम साकळगावकर

-------------------------------------------------

पर्यायी इंधन गरजेचे

आपण केवळ पेट्रोल आणि डिझेलवरच अवलंबून आहोत. ही बाब आता दूर सारावी लागेल. सीएनजी तसेच इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या वाहनांची आता गरज आहे. अनेक कंपन्या यावर काम करत आहेत. यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन देऊ केले आहे. तसेच इथेनॉलचा वापर करून पेट्रोल तसेच डिझेलला पर्याय शोधला पाहिजे.

महेंद्रकुमार भक्कड

---------------------------------

---------------

--------------------------------