शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

जालना-वडीगोद्री मार्गासाठी याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:15 AM

जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे

अंबड : जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. या मार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांत २८९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने याप्रश्नी आम्ही जनहित याचिका दाखल केली असल्याचे समितीचे संयोजक अ‍ॅड. किशोर राऊत यांनी सांगितले.जालना-वडीगोद्री हा रस्ता जालना जिल्ह्याला दक्षिणेकडील राज्यांशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. मात्र दुरवस्था पाहता याला राज्य महामार्ग कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांना जालना, औरंगाबाद, बीड व इतर शहरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, चौपदरीकरण करावे या मागणीसाठी आतापर्यंत दोन्ही तालुक्यांतील जनतेने अनेक आंदोलने केली. मात्र, शासन व प्रशासनाला अद्यापपर्यंत काहीही फरक पडलेला नाही.विशेष म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दोन आठवड्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याचे तालुक्यातील शहापूर येथे जाहीर केले. मात्र केवळ आठवडाभरातच सा. बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचे नूतनीकरण नव्हे, तर सुदृढीकरण होणार असून त्यासाठी केवळ २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे जनतेच्या संशयकल्लोळात भर पडली आहे.विविध आंदोलनांनंतर कंटाळलेल्या जनआंदोलन समितीने या प्रश्नी जनहित याचिका दाखल केल्याने आता तरी या रस्त्याचे भाग्य उजळेल का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे.