शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:36 IST

दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी घटण्यामागे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील जुनी थकबाकी न भरल्याने बँकांनी कर्ज वाटपाचा हात आखडता घेतल्याचे सांगण्यात आले. दुष्काळ असल्याने दुष्काळी अनुदान तसेच पीकविमा मिळून जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एक हजार कोटी पेक्षा अधिक रूपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, परंतु त्यातून कर्ज वसुली न करण्याचे निर्देश असल्याने बँका हतबल झाल्या आहेत.गेल्या वर्षीचा विचार करता जालना जिल्ह्यात जवळपास एक हजार शंभर कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यंदाच्या कृषीपत आराखड्यातही जवळपास अकराशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी यंदा केवळ चारशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी का घसरली या संदर्भात दोन ते तीन बँक अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शेतक-यांना यंदाचे वर्ष हे निवडणूकीचे असल्याचे माहीत होते. त्यामुळे एखाद्यावेळी सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अपेक्षित होती. त्यामुळे त्यांच्याकडील पीककर्जाची थकबाकी त्यांनी न भरल्याने आम्ही आधीच थकबाकीत असलेल्यांना बँकेच्या व्यवहारानुसार कर्ज देता येत नाही.याचाही मोठा परिणाम कर्ज वाटपावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे वास्तव आहे. दरम्यान एकट्या जिल्हा बँकेने त्यांना दिलेल्या ८५ कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के कर्ज वाटप केले आहे. यंदा खरीप हंगामातच पावसाने दगा दिल्याने रबी हंगमाचा प्रश्नच उद्भवत नसल्याने यंदाचे रबीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. गव्हाचा पेरा यंदा कमी पावसामुळे घटणार आहे. परतीच्या पावासाने दिलासा दिल्याने तरी शाळू ज्वारीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले. यंदा हरभराही जास्त लावणार नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.यापुढे कर्जमाफी मिळणे अशक्य...अनेक राजकीय पक्षांकडून शेतक-यांच्या भावनिक मुद्याला हात घालून सरकट कर्जमाफीची घोषणा करत आहेत. परंतु बँक अधिका-यांच्या म्हणण्यानुसार आता कर्जमाफी देतांना बँकाकडून त्याला कडक विरोध होईल या कर्जमाफीच्या घोषणेने बँकांचा एपीए मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.दुष्काळ तसेच वेगवेगळ्या आस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल होत आहे. असे असले तरी, आता भविष्यात कुठलेही सरकार आले तरी असा निर्णय घेताना त्यांना आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी