शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:36 IST

दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी घटण्यामागे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील जुनी थकबाकी न भरल्याने बँकांनी कर्ज वाटपाचा हात आखडता घेतल्याचे सांगण्यात आले. दुष्काळ असल्याने दुष्काळी अनुदान तसेच पीकविमा मिळून जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एक हजार कोटी पेक्षा अधिक रूपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, परंतु त्यातून कर्ज वसुली न करण्याचे निर्देश असल्याने बँका हतबल झाल्या आहेत.गेल्या वर्षीचा विचार करता जालना जिल्ह्यात जवळपास एक हजार शंभर कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यंदाच्या कृषीपत आराखड्यातही जवळपास अकराशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी यंदा केवळ चारशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी का घसरली या संदर्भात दोन ते तीन बँक अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शेतक-यांना यंदाचे वर्ष हे निवडणूकीचे असल्याचे माहीत होते. त्यामुळे एखाद्यावेळी सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अपेक्षित होती. त्यामुळे त्यांच्याकडील पीककर्जाची थकबाकी त्यांनी न भरल्याने आम्ही आधीच थकबाकीत असलेल्यांना बँकेच्या व्यवहारानुसार कर्ज देता येत नाही.याचाही मोठा परिणाम कर्ज वाटपावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे वास्तव आहे. दरम्यान एकट्या जिल्हा बँकेने त्यांना दिलेल्या ८५ कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के कर्ज वाटप केले आहे. यंदा खरीप हंगामातच पावसाने दगा दिल्याने रबी हंगमाचा प्रश्नच उद्भवत नसल्याने यंदाचे रबीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. गव्हाचा पेरा यंदा कमी पावसामुळे घटणार आहे. परतीच्या पावासाने दिलासा दिल्याने तरी शाळू ज्वारीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले. यंदा हरभराही जास्त लावणार नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.यापुढे कर्जमाफी मिळणे अशक्य...अनेक राजकीय पक्षांकडून शेतक-यांच्या भावनिक मुद्याला हात घालून सरकट कर्जमाफीची घोषणा करत आहेत. परंतु बँक अधिका-यांच्या म्हणण्यानुसार आता कर्जमाफी देतांना बँकाकडून त्याला कडक विरोध होईल या कर्जमाफीच्या घोषणेने बँकांचा एपीए मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.दुष्काळ तसेच वेगवेगळ्या आस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल होत आहे. असे असले तरी, आता भविष्यात कुठलेही सरकार आले तरी असा निर्णय घेताना त्यांना आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी