शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पवारांच्या दौऱ्यामुळे राकाँला मिळणार बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:22 IST

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे जालन्यावर २००४ मध्ये वर्चस्व होते. तीन आमदार याच पक्षाचे होते. मात्र, नंतर या वर्चस्वाला युतीने धक्का दिल्याने आज घनसावंगी मतदार संघातच थोडेफार राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तीत्व दिसते. माजी आ. चंद्रकांत दानवे हे देखील तीन वेळेस आमदार राहिले. ते भाजपच्या बालेकिल्लयात राहून खा. रावसाहेब दानवेंना टक्कर देण्याचा प्रयत्न करता, परंतु ते एकटेच खिंड लढवत असल्याने त्यांना मर्यादा येतात. जालन्यातही राष्ट्रवादीचे अस्तीत्व हे जमेतेमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.मध्यंतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ येते तथा माजी खा.अंकुशराव टोपे यांच्या संघटन कौशल्यातून जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा होता. त्यांनी सहकार, शिक्षण तसेच शेती आणि अन्य विकास संस्थांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकासाचे राजकारण केले. त्यांना त्यात यशही आले. राजकारण करत असतांना त्यांचा खमक्या स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा सर्वांना ज्ञात असल्याने त्यांचा एक प्रकारे दराराच होता. आता ते हयात नाहीत, त्यामुळे देखील पक्ष विस्तारावर मर्यादा येत आहेत.मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले अरविंद चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला होता, परंतु ते आता स्वगृही परतले आहेत. त्यामुळे जालन्यात मोठा आधार मिळणार आहे. जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. जाफराबाद तालुक्यातील माजी सभापती राजेश चव्हाण यांनी राकॉला जय महाराष्ट्र केला आहे.आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावालोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स येथे होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, माजी आ. अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ब-याच कालावधीनंतर शरद पवार हे जालना दौºयावर येत असल्याने त्यांच्या या दौºयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगाव संपर्क अभियान राबवून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचे निवेदन तयार केले असून, हे निवेदन शरद पवारांकडे देण्यात येणार आहे. जणेकरून शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींकडे शरद पवार हे लक्ष वेधून शकतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक