शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

पवारांच्या दौऱ्यामुळे राकाँला मिळणार बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:22 IST

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे जालन्यावर २००४ मध्ये वर्चस्व होते. तीन आमदार याच पक्षाचे होते. मात्र, नंतर या वर्चस्वाला युतीने धक्का दिल्याने आज घनसावंगी मतदार संघातच थोडेफार राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तीत्व दिसते. माजी आ. चंद्रकांत दानवे हे देखील तीन वेळेस आमदार राहिले. ते भाजपच्या बालेकिल्लयात राहून खा. रावसाहेब दानवेंना टक्कर देण्याचा प्रयत्न करता, परंतु ते एकटेच खिंड लढवत असल्याने त्यांना मर्यादा येतात. जालन्यातही राष्ट्रवादीचे अस्तीत्व हे जमेतेमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.मध्यंतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ येते तथा माजी खा.अंकुशराव टोपे यांच्या संघटन कौशल्यातून जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा होता. त्यांनी सहकार, शिक्षण तसेच शेती आणि अन्य विकास संस्थांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकासाचे राजकारण केले. त्यांना त्यात यशही आले. राजकारण करत असतांना त्यांचा खमक्या स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा सर्वांना ज्ञात असल्याने त्यांचा एक प्रकारे दराराच होता. आता ते हयात नाहीत, त्यामुळे देखील पक्ष विस्तारावर मर्यादा येत आहेत.मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले अरविंद चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला होता, परंतु ते आता स्वगृही परतले आहेत. त्यामुळे जालन्यात मोठा आधार मिळणार आहे. जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. जाफराबाद तालुक्यातील माजी सभापती राजेश चव्हाण यांनी राकॉला जय महाराष्ट्र केला आहे.आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावालोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स येथे होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, माजी आ. अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ब-याच कालावधीनंतर शरद पवार हे जालना दौºयावर येत असल्याने त्यांच्या या दौºयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगाव संपर्क अभियान राबवून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचे निवेदन तयार केले असून, हे निवेदन शरद पवारांकडे देण्यात येणार आहे. जणेकरून शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींकडे शरद पवार हे लक्ष वेधून शकतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक