शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

रांजणी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, धनबाद-मनमाड या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी ...

रांजणी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, धनबाद-मनमाड या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी आरक्षण गरजेचे असते, तसा प्रवास करता येत नाही. रांजणी येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांची गर्दी असते. मागील वर्षभरापूर्वी राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद करण्यात आले होते. रेल्वे, बस, विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. हळूहळू सर्वच व्यवहार सुरू करण्यात आले. केंद्र शासनाने विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या. परंतु, अद्यापही पॅसेंजर गाड्या न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. प्रवाशांना जास्तीचे तिकीट काढून स्पेशल गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. एक्स्प्रेस गाडीसाठी रांजणी येथून औरंगाबादला जाण्यासाठी ८० तर जालन्याला ६० रूपये मोजावे लागतात. तर पॅसेंजर गाडीसाठी औरंगाबादला जाण्यासाठी २५ तर जालन्याला १० रूपये द्यावे लागतात. सध्या येथील प्रवाशांना एक्स्प्रेस गाडीने जास्तीचे भाडे देऊन जावे लागत आहे. यामुळे प्रवाशी हैराण झाले आहे. शिवाय एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मी नेहमी परभणी औरंगाबाद, जालना येथे रेल्वेने जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने एक्स्प्रेस गाडीने जावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, खिशाला आर्थिक फटका बसत आहे. केंद्र शासनाने तातडीने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, असे एका प्रवाशाने सांगितले.

गेल्या दहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे. एक्स्प्रेसमुळे तिकीट जास्त लागत आहे. यात आरक्षित तिकीट स्थानकावर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

निलेश वालझाडे, प्रवासी