शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:34 IST

शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसह फळबागा नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.खोतकर यांनी सोमवारी प्रशासकीय अधिका-यांसमवेत शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांनी खचून जाऊ नये. आपण स्वत:, शिवसेना पक्ष व शासन तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे सांगत खोतकरांनी शेतक-यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, पं.स. सदस्य जनार्दन चौधरी, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, बाबा मोरे, तुळशीदास काळे, मुरलीधर शेजुळ, तुकाराम शेजुळ, मुरलीधर थेटे, शैलेश घुमारे, काशिनाथ जाधव, प्रभाकर सुळसुळे, गणेश शिंदे, आप्पासाहेब उगले, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.खोतकर यांनी गोलापांगरी येथील मनोज मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच कल्याण प्रकल्प सिडस येथे उध्वस्त झालेले कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांची पाहणी केली. जळगाव सोमनाथ, वखारी व धारकल्याण येथे भेटी देऊन बागांची पाहणी केली. दरम्यान, बाजीउम्रद येथील शेतकरी शिवाजी डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत  संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी शेतक-यांनीही आपल्या व्यथा खोतकरांसमोर मांडल्या.खरीप हंगामातील दमडीही शेतक-यांच्या हाती मिळाली नाही. खचलेल्या शेतक-यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली. मात्र दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने ही पेरणीही वाया गेली आहे. त्यामुळे पंचनामे करताना खरिपाबरोबर रबी हंगामातील पेरणी, पिकांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खोतकरांनी दिल्या.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस