शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:34 IST

शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसह फळबागा नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.खोतकर यांनी सोमवारी प्रशासकीय अधिका-यांसमवेत शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांनी खचून जाऊ नये. आपण स्वत:, शिवसेना पक्ष व शासन तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे सांगत खोतकरांनी शेतक-यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, पं.स. सदस्य जनार्दन चौधरी, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, बाबा मोरे, तुळशीदास काळे, मुरलीधर शेजुळ, तुकाराम शेजुळ, मुरलीधर थेटे, शैलेश घुमारे, काशिनाथ जाधव, प्रभाकर सुळसुळे, गणेश शिंदे, आप्पासाहेब उगले, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.खोतकर यांनी गोलापांगरी येथील मनोज मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच कल्याण प्रकल्प सिडस येथे उध्वस्त झालेले कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांची पाहणी केली. जळगाव सोमनाथ, वखारी व धारकल्याण येथे भेटी देऊन बागांची पाहणी केली. दरम्यान, बाजीउम्रद येथील शेतकरी शिवाजी डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत  संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी शेतक-यांनीही आपल्या व्यथा खोतकरांसमोर मांडल्या.खरीप हंगामातील दमडीही शेतक-यांच्या हाती मिळाली नाही. खचलेल्या शेतक-यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली. मात्र दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने ही पेरणीही वाया गेली आहे. त्यामुळे पंचनामे करताना खरिपाबरोबर रबी हंगामातील पेरणी, पिकांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खोतकरांनी दिल्या.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस