शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पंढरीत येण्यास पालख्या, दिंड्यांना मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीनिमित्त जिल्ह्यातील पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे नेऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ...

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीनिमित्त जिल्ह्यातील पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे नेऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी केले आहे. पंढरपुरात प्रवेश मिळणार नसल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पंढरपूर येथे आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्‍द एकादशी या दिवशी भरते. यंदाची आषाढी यात्रा मंगळवारी २० जुलै रोजी भरणार आहे. या आषाढी यात्रेचा कालावधी ११ ते २४ जुलै असा राहणार आहे. शासनाने १४ जून २०२१ रोजी आषाढीवारी मर्यादित स्‍वरूपात साध्‍या पध्‍दतीने आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ११ ते २८ जुलै २०२१ या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. सर्व दिंडी व पालख्‍यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र फक्‍त १० मानाच्‍या पालख्‍यांना मर्यादित स्‍वरूपात विहीत अटी व शर्तीवर पंढरपूर येथे येण्यास परवानगी दिली आहे. त्‍यामुळे आषाढी कालावधीमध्‍ये पंढरपूर येथे संचारबंदी पाच दिवसांसाठी लागू करण्यात येणार आहे. इतर दिंडी व पालख्‍यांना शासनाने परवानगी दिलेली नसल्‍यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येता येणार नाही. आषाढी वारीनिमित्त देवस्‍थानात करावयाचे नित्‍योपचार समितीच्या मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत व सामाजिक अंतर राखून, सूचनांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहेत. आषाढी वारी ही २० जुलै रोजी असल्‍यामुळे राज्‍यातील विविध गावांमधून दिंड्या व वारकरी पालख्‍या या १५ दिवसांपूर्वी पंढरपूरकडे येत असतात. आपल्‍या अधीनस्‍त पालख्‍या, दिंड्या यांच्‍या आयोजकांना सदरची बाब निदर्शनास आणून देऊन पंढरपूरकडे प्रस्‍थान करू नये, असे आवाहन जालना येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.