शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पान दोन पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, ...

जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, त्यामुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दुचाकीमागेही मोकाट कुत्रे लागतात. त्यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही.

‘त्या’ परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्यांना प्रमाणपत्र

जालना : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या परीक्षार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जि.प. मुलांची प्रशाला येथे ५ जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत या प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. पात्र परीक्षार्थींनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे आ‌वश्यक आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी

जालना : मागील काही महिन्यांपूर्वी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु सद्य:स्थितीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असून, सदरील कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या हेतूने जालना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

तलावातील झाडे-झुडपे तोडणार

जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी (संत गाडगेबाबा) जलाशय परिसरात काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ही झाडे-झुडपे तोडण्याबाबतचा ठराव नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. जलाशय परिसरात झाडे-झुडपे वाढली असल्याने जलाशयाच्या भिंतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून झाडे-झुडपे तोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

पंडित व्ही. वासरे यांची सदस्यपदी नेमणूक

जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून पंडित व्ही. वासरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंडित वासरे सध्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सदस्यपदाचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे.

हरभरा पिकावर अळी; उत्पादक चिंतेत

जालना : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, या बदलाचा फटका हरभरा पिकाला बसला आहे. सध्या अनेक गावांमध्ये हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरिपातील कपाशी, मका आदी पिके गेली आहेत. आता शेतकऱ्यांची सर्व मदार रबी पिकांवर आहे; परंतु बदलत्या वातावरणाचा या पिकांना फटका बसत आहे.