शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पान दोन पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, ...

जाफराबाद : तालुक्यातील डोणगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यातच गुरुवारी दोन कुत्र्यांनी एका लहान मुलाला चावा घेतला, त्यामुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दुचाकीमागेही मोकाट कुत्रे लागतात. त्यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही.

‘त्या’ परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्यांना प्रमाणपत्र

जालना : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या परीक्षार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जि.प. मुलांची प्रशाला येथे ५ जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत या प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. पात्र परीक्षार्थींनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे आ‌वश्यक आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी

जालना : मागील काही महिन्यांपूर्वी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु सद्य:स्थितीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असून, सदरील कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या हेतूने जालना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

तलावातील झाडे-झुडपे तोडणार

जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी (संत गाडगेबाबा) जलाशय परिसरात काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ही झाडे-झुडपे तोडण्याबाबतचा ठराव नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. जलाशय परिसरात झाडे-झुडपे वाढली असल्याने जलाशयाच्या भिंतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून झाडे-झुडपे तोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

पंडित व्ही. वासरे यांची सदस्यपदी नेमणूक

जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून पंडित व्ही. वासरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंडित वासरे सध्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सदस्यपदाचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे.

हरभरा पिकावर अळी; उत्पादक चिंतेत

जालना : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, या बदलाचा फटका हरभरा पिकाला बसला आहे. सध्या अनेक गावांमध्ये हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरिपातील कपाशी, मका आदी पिके गेली आहेत. आता शेतकऱ्यांची सर्व मदार रबी पिकांवर आहे; परंतु बदलत्या वातावरणाचा या पिकांना फटका बसत आहे.