शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

बदनापूर : तालुक्यातील मांजरगावसह काही गावांतील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील पाच दिवसांपासून गाव व परिसर अंधारात आहे. ...

बदनापूर : तालुक्यातील मांजरगावसह काही गावांतील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील पाच दिवसांपासून गाव व परिसर अंधारात आहे. वीज नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देवून गावाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

जालना : गेल्या वीस वर्षांपासून ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षक विनावेतन शिकविण्याचे काम करत आहे. त्यांना वेतन मंजूर असूनही दिले जात नाही. त्या शिक्षकांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

मिनी बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

भोकरदन : शहरातील महात्मा फुले चौक ते सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहापर्यंत मिनी बायपास रस्ता काढण्यात आला असून, या रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्चही केले. परंतु, पुखराजनगर शेजारील पुलाजवळील काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. तसेच ऐन रस्त्यावर असलेला विजेचा खांबही हटविण्यात आला नाही. लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ओबीसी माेर्चासाठी बदनापूर येथे बैठक

बदनापूर : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी यांची वेगळा कॉलम करून जनगणना व्हावी, यासाठी रविवारी बदनापूर येथील सावता सभागृहात तालुकास्तरीय बैठक झाली. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ओबीसींना कसे वंचित ठेवले गेले, यावर सविस्तर चर्चा झाली. आपल्या विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

अर्धे आव्हाना गाव तीन महिन्यांपासून अंधारात

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील टोकावर असलेल्या आव्हाना गावात विजेचा प्रश्न कायम भेडसावत आहे. आतातर या ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असल्याने मतदारांसमोर कसे जावे, असा प्रश्न निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार व पॅनलप्रमुखांना पडला आहे. मागील तीन महिन्यापासून अर्धे गाव अंधारात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

राममंदिर बांधकाम निधीसंदर्भात बैठक

तीर्थपुरी: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य मंदिर बांधकाम होणार असल्याने त्यासंदर्भात संपूर्ण भारतभर निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बजरंग दलाचे राजेंद्र चिमणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रामेश्वर बोबडे, संजय मापारे, राम बनकर, रमेश गाडेकर, श्रीहरी वाजे, अनिल जावध, मछू भापकर आदींची उपस्थिती होती.