शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक ...

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रांसह शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तळणीत अवैध प्रवासी वाहतूक जोरात

तळणी: मंठा तालुक्यातील तळणी- मंठा, लोणार- तळणी, तळणी- उस्वद- मंठा, जयपूर- वाटूर, गारटेकी- चौफुली, वझर सरकटे- सेवली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहेत. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.

तळणी परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे पान स्टॉल व किराणा दुकानातून सर्रास गुटखा विक्री होत आहे. सहज गुटखा मिळत असल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. याकडे अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी बाबा मोरे, संजू कांबळे यांनी केली आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही बहुतांश ठिकाणी सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आज रामनगर येथे निवृत्ती महाराजांचे कीर्तन

जालना : श्री दत्तजयंतीनिमित्त रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, याअंतर्गत सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. कीर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर हे सुश्राव्य हरिकीर्तनातून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त, जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर यांनी दिली.

जांबसमर्थ येथे पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडाळात रब्बी हंगामात वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस व मोसंबी, डाळींब, सीताफळ आदी खरीप हंगामातील पिकांची वाट लावली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रब्बीची पिके जोमात आली आहे; परंतु, वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

परतूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

परतूर : येथील बागल परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. विशाल बागल यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले आहे. शासनानेही रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड. विशाल बागल यांनी केले आहे.