शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक ...

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रांसह शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तळणीत अवैध प्रवासी वाहतूक जोरात

तळणी: मंठा तालुक्यातील तळणी- मंठा, लोणार- तळणी, तळणी- उस्वद- मंठा, जयपूर- वाटूर, गारटेकी- चौफुली, वझर सरकटे- सेवली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहेत. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.

तळणी परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे पान स्टॉल व किराणा दुकानातून सर्रास गुटखा विक्री होत आहे. सहज गुटखा मिळत असल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. याकडे अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी बाबा मोरे, संजू कांबळे यांनी केली आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही बहुतांश ठिकाणी सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आज रामनगर येथे निवृत्ती महाराजांचे कीर्तन

जालना : श्री दत्तजयंतीनिमित्त रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, याअंतर्गत सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. कीर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर हे सुश्राव्य हरिकीर्तनातून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त, जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर यांनी दिली.

जांबसमर्थ येथे पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडाळात रब्बी हंगामात वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस व मोसंबी, डाळींब, सीताफळ आदी खरीप हंगामातील पिकांची वाट लावली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रब्बीची पिके जोमात आली आहे; परंतु, वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

परतूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

परतूर : येथील बागल परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. विशाल बागल यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले आहे. शासनानेही रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड. विशाल बागल यांनी केले आहे.