शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक ...

मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रांसह शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तळणीत अवैध प्रवासी वाहतूक जोरात

तळणी: मंठा तालुक्यातील तळणी- मंठा, लोणार- तळणी, तळणी- उस्वद- मंठा, जयपूर- वाटूर, गारटेकी- चौफुली, वझर सरकटे- सेवली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहेत. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.

तळणी परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे पान स्टॉल व किराणा दुकानातून सर्रास गुटखा विक्री होत आहे. सहज गुटखा मिळत असल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. याकडे अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी बाबा मोरे, संजू कांबळे यांनी केली आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही बहुतांश ठिकाणी सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आज रामनगर येथे निवृत्ती महाराजांचे कीर्तन

जालना : श्री दत्तजयंतीनिमित्त रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, याअंतर्गत सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. कीर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर हे सुश्राव्य हरिकीर्तनातून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त, जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर यांनी दिली.

जांबसमर्थ येथे पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडाळात रब्बी हंगामात वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस व मोसंबी, डाळींब, सीताफळ आदी खरीप हंगामातील पिकांची वाट लावली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रब्बीची पिके जोमात आली आहे; परंतु, वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

परतूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

परतूर : येथील बागल परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. विशाल बागल यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले आहे. शासनानेही रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड. विशाल बागल यांनी केले आहे.