शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जामखेड : अंबड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले. परंतु, जामखेड येथील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे ...

जामखेड : अंबड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले. परंतु, जामखेड येथील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले असून, तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्मारक बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

जालना : शहरातील स्वातंत्र्य सैनिक स्मारक बांधकामाची चौकशी करून शहरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांची नावे त्यावर नमूद करावीत, अशी मागणी जालना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्ताराधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेशाम जायस्वाल यांनी केली आहे. मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

नंदापूर येथे कृषी सचिव डवले यांची भेट

जालना : तालुक्यातील नंदापूर येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी गावविकासाची माहिती दिली. कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.

बंद झालेली मराठवाडा एक्सप्रेस पुन्हा पटरीवर

जालना : मराठवाड्यातील चाकरमान्यांसाठी रक्तवाहिनी असलेली नांदेड- मनमाड ही मराठवाडा एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा पटरीवर धावली आहे. त्यामुळे नांदेड ते औरंगाबाद ये-जा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. मराठवाडा एक्सप्रेसमधून जालना स्थानकावर सकाळी ७० प्रवासी उतरले तर औरंगाबाद- मनमाडकडे जाण्यासाठी १५ प्रवासी बसले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दानकुंवर कन्या विद्यालयात जयंती साजरी

जालना : येथील श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयात साने गुरूजी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी साने गुरूजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले, संदीप बोणकावले, संतोष लिंगायत, मुख्याध्यापिका अर्पणा पवार, चंद्रकांत दायमा, किरण शर्मा आदींची उपस्थिती होती.

जिल्हा संघटक नीलेश कुरिहे यांचा सत्कार

जालना : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संघटकपदी शिवव्याख्याते नीलेश कुहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अर्जुन साबळे, विजय साबळे, सुनील चांदणे, संग्राम पाटील, शेख जावेद, ज्ञानेश्वर राठोड, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या निवडीचे स्वागत होत आहे.

जेईएस महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

जालना : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.बी. बजाज यांनी केले. जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, उपप्राचार्य पगारे, प्रा. जगताप, प्रा. बाफना, कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. गणेश रोकडे, मनोज मेहर आदींची उपस्थिती होती.