शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

पान तीन लहान बातम्या ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार ...

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार जडू लागले आहेत. हे आजार म्हणजे कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकांनी शासकीय रूग्णालयात न जाता खासगी रूग्णालयात जाऊन उपचार घेण्यावर भर दिला आहे. शहरातील खासगी रूग्णालयात सध्या रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

घोलप यांचा सत्कार

जालना : सावता परिषद युवक संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी एकनाथ घोलप यांची निवड करण्यात आली आहे. घोलप यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घोलप यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंबेकर, घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संदीप मगर आदींची उपस्थिती होती.

केंधळीत वन विभागाच्या पथकाकडून पाहणी

मंठा: तालुक्यातील केंधळी शिवारात चार दिवसांपासून वाघ असल्याची चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने केंधळी परिसरात वन्य प्राण्यांच्या ठशांची पाहणी केली. त्यावेळी तो प्राणी वाघ नसून तडस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यावेळी वनरक्षक रूक्मिनी बनसोडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देत भरपाईची मागणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

माहोऱ्यात विजेचा लपंडाव

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा व परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे . ओव्हर लोडच्या नावाखाली गावातील वीज १६ तास जात राहत आहे . गावातील उपकेंद्रात अभियंता फिरकत नाहीत. अभियंत्यांशी संपर्कही होत नाही. त्यामुळे होणारा त्रास मांडायचा कोणाकडे ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे . मात्र, असे असताना अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवित आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.