शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पान तीन लहान बातम्या ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार ...

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार जडू लागले आहेत. हे आजार म्हणजे कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकांनी शासकीय रूग्णालयात न जाता खासगी रूग्णालयात जाऊन उपचार घेण्यावर भर दिला आहे. शहरातील खासगी रूग्णालयात सध्या रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

घोलप यांचा सत्कार

जालना : सावता परिषद युवक संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी एकनाथ घोलप यांची निवड करण्यात आली आहे. घोलप यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घोलप यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंबेकर, घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संदीप मगर आदींची उपस्थिती होती.

केंधळीत वन विभागाच्या पथकाकडून पाहणी

मंठा: तालुक्यातील केंधळी शिवारात चार दिवसांपासून वाघ असल्याची चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने केंधळी परिसरात वन्य प्राण्यांच्या ठशांची पाहणी केली. त्यावेळी तो प्राणी वाघ नसून तडस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यावेळी वनरक्षक रूक्मिनी बनसोडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देत भरपाईची मागणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

माहोऱ्यात विजेचा लपंडाव

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा व परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे . ओव्हर लोडच्या नावाखाली गावातील वीज १६ तास जात राहत आहे . गावातील उपकेंद्रात अभियंता फिरकत नाहीत. अभियंत्यांशी संपर्कही होत नाही. त्यामुळे होणारा त्रास मांडायचा कोणाकडे ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे . मात्र, असे असताना अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवित आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.