शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पान तीन लहान बातम्या ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार ...

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार जडू लागले आहेत. हे आजार म्हणजे कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकांनी शासकीय रूग्णालयात न जाता खासगी रूग्णालयात जाऊन उपचार घेण्यावर भर दिला आहे. शहरातील खासगी रूग्णालयात सध्या रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

घोलप यांचा सत्कार

जालना : सावता परिषद युवक संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी एकनाथ घोलप यांची निवड करण्यात आली आहे. घोलप यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घोलप यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंबेकर, घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संदीप मगर आदींची उपस्थिती होती.

केंधळीत वन विभागाच्या पथकाकडून पाहणी

मंठा: तालुक्यातील केंधळी शिवारात चार दिवसांपासून वाघ असल्याची चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने केंधळी परिसरात वन्य प्राण्यांच्या ठशांची पाहणी केली. त्यावेळी तो प्राणी वाघ नसून तडस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यावेळी वनरक्षक रूक्मिनी बनसोडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देत भरपाईची मागणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

माहोऱ्यात विजेचा लपंडाव

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा व परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे . ओव्हर लोडच्या नावाखाली गावातील वीज १६ तास जात राहत आहे . गावातील उपकेंद्रात अभियंता फिरकत नाहीत. अभियंत्यांशी संपर्कही होत नाही. त्यामुळे होणारा त्रास मांडायचा कोणाकडे ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे . मात्र, असे असताना अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवित आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.