शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली. या अंतर्गत गुरूवारी या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांच्या नातेवाईकांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.यंदाचा हा सोहळा दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द भागवतकार शेष महाराज गोंदीकर, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातमधून या सामूहिक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पाचवर्ष हा सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. तर २००५ पाासून हा सोहळा जालन्यात सुरू करण्यात आल्याचे रमेश पटेल म्हणाले. यासाठी आमच्या उद्योगासह जालन्यातील अन्य दानशूर व्यक्तींकडून यासाठी मदत होत असल्याचेही पटेल यांनी आवर्जून सांगितले.हा आपला वारसा मुलगा भावेश पटेल तसेच त्यांचा मित्र परिवार तेवढ्याच उत्साहाने पुढे नेत असल्याचे समाधान आपल्याला होत आहे. गुरूवारी भाईश्री चेंबरच्या कार्यालयात दुपारी वधू-वरांच्या जोडप्यास संसारोपयोगी वस्तूंच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भावेश पटेल, रितेश मंत्री यांचीही उपस्थिती होती.५०० जोडप्यांचे संसार गुण्यागोविंदानेआम्ही हाती घेतलेल्या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यात आतापर्यंत ज्या जोडप्यांचे विवाह झाले, त्यांचे संसार आज सर्वत्र गुण्या गोविंदाने सुरू आहेत, हे त्यांच्याच्या तोंडून ऐकून मोठे समाधान होते. या उपक्रमातून जे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, त्यांना जी मदत मिळते ती देखील इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.- रमेश पटेल, संयोजन समितीचे अध्यक्ष

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक