शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली. या अंतर्गत गुरूवारी या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांच्या नातेवाईकांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.यंदाचा हा सोहळा दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द भागवतकार शेष महाराज गोंदीकर, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातमधून या सामूहिक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पाचवर्ष हा सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. तर २००५ पाासून हा सोहळा जालन्यात सुरू करण्यात आल्याचे रमेश पटेल म्हणाले. यासाठी आमच्या उद्योगासह जालन्यातील अन्य दानशूर व्यक्तींकडून यासाठी मदत होत असल्याचेही पटेल यांनी आवर्जून सांगितले.हा आपला वारसा मुलगा भावेश पटेल तसेच त्यांचा मित्र परिवार तेवढ्याच उत्साहाने पुढे नेत असल्याचे समाधान आपल्याला होत आहे. गुरूवारी भाईश्री चेंबरच्या कार्यालयात दुपारी वधू-वरांच्या जोडप्यास संसारोपयोगी वस्तूंच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भावेश पटेल, रितेश मंत्री यांचीही उपस्थिती होती.५०० जोडप्यांचे संसार गुण्यागोविंदानेआम्ही हाती घेतलेल्या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यात आतापर्यंत ज्या जोडप्यांचे विवाह झाले, त्यांचे संसार आज सर्वत्र गुण्या गोविंदाने सुरू आहेत, हे त्यांच्याच्या तोंडून ऐकून मोठे समाधान होते. या उपक्रमातून जे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, त्यांना जी मदत मिळते ती देखील इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.- रमेश पटेल, संयोजन समितीचे अध्यक्ष

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक