शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली. या अंतर्गत गुरूवारी या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांच्या नातेवाईकांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.यंदाचा हा सोहळा दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द भागवतकार शेष महाराज गोंदीकर, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातमधून या सामूहिक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पाचवर्ष हा सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. तर २००५ पाासून हा सोहळा जालन्यात सुरू करण्यात आल्याचे रमेश पटेल म्हणाले. यासाठी आमच्या उद्योगासह जालन्यातील अन्य दानशूर व्यक्तींकडून यासाठी मदत होत असल्याचेही पटेल यांनी आवर्जून सांगितले.हा आपला वारसा मुलगा भावेश पटेल तसेच त्यांचा मित्र परिवार तेवढ्याच उत्साहाने पुढे नेत असल्याचे समाधान आपल्याला होत आहे. गुरूवारी भाईश्री चेंबरच्या कार्यालयात दुपारी वधू-वरांच्या जोडप्यास संसारोपयोगी वस्तूंच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भावेश पटेल, रितेश मंत्री यांचीही उपस्थिती होती.५०० जोडप्यांचे संसार गुण्यागोविंदानेआम्ही हाती घेतलेल्या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यात आतापर्यंत ज्या जोडप्यांचे विवाह झाले, त्यांचे संसार आज सर्वत्र गुण्या गोविंदाने सुरू आहेत, हे त्यांच्याच्या तोंडून ऐकून मोठे समाधान होते. या उपक्रमातून जे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, त्यांना जी मदत मिळते ती देखील इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.- रमेश पटेल, संयोजन समितीचे अध्यक्ष

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक