शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

इंटरपॉइंट स्थलांतरास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:48 IST

सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजामवाडी : नागपूर - समृद्धी हायवेवर जालना शहरालगत जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी शिवारात इंटरचेंज पॉइंट प्रस्तावित करण्यात आलेले आहे. परंतू, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळातील काही वरिष्ठ अधिकारी, नेते मंडळी हा इंटरचेंज पॉइंट हलवून निधोना किंवा खादगाव येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी ३० डिसेंबर २०१६ व ८ मार्च २०१७ रोजी दोन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या अधिसुचनेनुसार जामवाडी शिवारातील १.९७ हेक्टर गुंडेवाडी शिवारातील ६५.८० हेक्टर जमीन तांदूळवाडी शिवारातील ६. ९८ हेक्टर व जालना शिवारातील ६. ७३ हेक्टर जमीन इंटरजेंच पॉर्इंट अधिसूचित करण्यात आलेली आहे.अधिसूचित करण्यात आलेला इंटरचेंज पॉइंट शहरातील काही उद्योजक , संबंधित खात्यातील अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.निधोना व खादगाव येथील जमीनीचा शासकीय दर ८० ते ९६ लक्ष रूपये एकर असून, जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी जमिनीचा शासकीय दर ३० ते ६० लक्ष रूपये प्रति एकर आहे. इंटरचेंजसाठी बहुतेक जिरायत जमीन अधिसूचित करण्यात आलेली आहे. बहुतांश जमीनीला ३० लक्ष रूपये प्रति एकर भाव द्यावा लागेल तर निधोना व खादगाव येथे ८० ते ९६ लक्ष रूपये भाव द्यावा लागेल. त्यामुळे शासनाचे १०० कोटींचे नुकसान होऊ शकते. असे निवेदनात म्हटले आहे.हा इंटरचेंज पॉइंट जेथे प्रस्तावित आहे तेथेच ठेवावा. तो स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न केल्यास जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावातील २०० शेतकरी सामुहिक आत्मदहन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांच्यासह शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. हा प्रश्न प्रारंंभीपासून गाजत असून,याबाबत सर्वत्र मौन पाळले जात आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी